शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

बदलापूरला मिळणार भोज धरणातील पाणी

By admin | Updated: November 14, 2015 02:11 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे

बदलापूर : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे. ऐन पाणीसंकटाच्या वेळी बदलापूरकरांना कोंडेश्वर येथील भोज धरणातून पाणी मिळणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात कमी होण्याचे आणि वेळेवर रद्द होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. बदलापूर हे शहर सर्वात जलद गतीने वाढणारे शहर म्हणून नावारूपाला आले. शहर वाढत असले तरी पाण्याचे स्रोत मात्र तेवढेच असल्याने बदलापूरकरांना आधीच पाणीसंकटाला सामोरे जावे लागत होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार आणि तत्कालीन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी बदलापूर शहराच्या हद्दीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या भोज धरणातील पाणी बदलापूरला मिळावे, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने २०१३ मध्ये आदेश काढून शहराला या धरणातील पाणी देण्याचे मान्य केले होते. मात्र, दोन वर्षांत यासंदर्भातील करारनामा न केल्याने ते पाणी बदलापूरकरांना मिळालेच नाही.मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी कथोरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संबंधित विभागाशी लागलीच करारनामा करून या धरणातील पाणी सोडण्यास अंतिम मंजुरी मिळविली आहे. यामुळे समस्या सुटण्याचे संकेत मिळत आहेत.