शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बदलापूरला मिळणार भोज धरणातील पाणी

By admin | Updated: November 14, 2015 02:11 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे

बदलापूर : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे. ऐन पाणीसंकटाच्या वेळी बदलापूरकरांना कोंडेश्वर येथील भोज धरणातून पाणी मिळणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात कमी होण्याचे आणि वेळेवर रद्द होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. बदलापूर हे शहर सर्वात जलद गतीने वाढणारे शहर म्हणून नावारूपाला आले. शहर वाढत असले तरी पाण्याचे स्रोत मात्र तेवढेच असल्याने बदलापूरकरांना आधीच पाणीसंकटाला सामोरे जावे लागत होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार आणि तत्कालीन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी बदलापूर शहराच्या हद्दीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या भोज धरणातील पाणी बदलापूरला मिळावे, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने २०१३ मध्ये आदेश काढून शहराला या धरणातील पाणी देण्याचे मान्य केले होते. मात्र, दोन वर्षांत यासंदर्भातील करारनामा न केल्याने ते पाणी बदलापूरकरांना मिळालेच नाही.मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी कथोरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संबंधित विभागाशी लागलीच करारनामा करून या धरणातील पाणी सोडण्यास अंतिम मंजुरी मिळविली आहे. यामुळे समस्या सुटण्याचे संकेत मिळत आहेत.