शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 02:42 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा दोन दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे येथे काळेख पसरला असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

कळंबोली - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा दोन दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे येथे काळेख पसरला असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते विकास महामंडळ व आयआरबीने याकडे वेळीच लक्ष देऊन बोगद्यातील दिवे चालू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधलेल्या या बोगद्याचे अंतर एक हजार ४६ मीटर आहे. आतमध्ये मोठे दिवे बसविण्यात आले आहेत. ते रात्रंदिवस सुरू असतात; परंतु गेल्या दोन दिवसापासून आतमधील दिवे बंद आहेत. त्यामुळे बोगद्यातील काळोखातून वाहने ये-जा करतात. अंधार असल्याने पुढची वाहने दिसत नाहीत. अचानक ब्रेक लावल्यास मागून आलेली वाहने धडकण्याची शक्यता असते.अंधारात वेग कमी जास्त करण्याससुद्धा वाहनचालकांना अडचणी येत आहेत. सध्या पावसाळी दिवस असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. भाताण तसेच अमृतांजन पुलाजवळ दरडी कोसण्याची भीती असते. दरडी कोसळल्याने कित्येकदा एकच लेन चालू असते. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे. रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गाची योग्य देखभाल होत नसून सुविधा पुरवण्यातही दिरंगाई केली जात असल्याचे प्रशांत रणवरे या वाहनचालकाने ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया नोंदवली.टोल घेऊनही गैरसोयमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो. यातून दररोज लाखो रुपयांची कमाई होते असे असताना सुविधा, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष का केले जाते असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारी यांनी उपस्थित केला आहे. दोन दिवस बंद असतील तर संबंधित कंपनीवर वाहनचालकांचा जीव धोक्यात घातला म्हणून कारवाई करा, अशी मागणी या आपण मुख्यमंत्री कार्यालयाकडे करणार असल्याचे भंडारी म्हणाले.भाताण बोगद्यातील दिवे बंद असेल तर पाहणी करून लवकरात लवकर दिवे सुरू करण्यात येईल. याबाबत वाहनचालकांना त्रास होणार नाही याची दखल घेतली जाईल.- नम्रता रेड्डी, कार्यकारीअभियंता, एमएसआरडीसी

टॅग्स :Raigadरायगडhighwayमहामार्ग