शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर निवडणूक मनसे स्वबळावर लढणार

By admin | Updated: June 27, 2017 02:56 IST

मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, इतर पक्षाने युती वा आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर पक्षध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल. त्यांच्या निर्देशानुसारच एकत्र लढणार असल्याचा पर्यायही राखून ठेवला आहे.२००७ मधील पालिका निवडणुकीत मनसेने माजी शहराध्यक्ष अरूण कदम यांच्या नेतृत्वाखाली चार जागांवर विजय मिळवला होता. २०१२ मधील निवडणुकीत मात्र एकमेव उमेदवार निवडून आला. तोसुद्धा सेनेत गेल्याने मनसेच्या अस्तित्वाला धक्का लागला. यानंतर पक्षबांधणीसाठी उपाध्यक्ष अरूण कदम यांच्यावर जबाबदारी सोपवली. मात्र पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज होऊन सेनेत सामील झाले. उरलेसुरले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोट बांधून शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी प्रयत्न सुरु केले. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावर ठाकरे यांनी मनसैनिकांना लढण्याचे निर्देश दिले. पक्षाची स्थिती नाजूक असली तरी निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सक्षम उमेदवार मिळत नसले तरी निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे. तसेच इतर पक्षातील पदाधिकारी देखील पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे ३० इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय तूर्तास घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत मते विभागणीसाठी मनसेचा वापर काही बड्या राजकीय पक्षांकडून केला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेने मात्र त्याला भीक न घालण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हे खरे असले तरी ऐन निवडणुकीच्यावेळेत काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.