शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

भार्इंदर निवडणूक मनसे स्वबळावर लढणार

By admin | Updated: June 27, 2017 02:56 IST

मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, इतर पक्षाने युती वा आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर पक्षध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल. त्यांच्या निर्देशानुसारच एकत्र लढणार असल्याचा पर्यायही राखून ठेवला आहे.२००७ मधील पालिका निवडणुकीत मनसेने माजी शहराध्यक्ष अरूण कदम यांच्या नेतृत्वाखाली चार जागांवर विजय मिळवला होता. २०१२ मधील निवडणुकीत मात्र एकमेव उमेदवार निवडून आला. तोसुद्धा सेनेत गेल्याने मनसेच्या अस्तित्वाला धक्का लागला. यानंतर पक्षबांधणीसाठी उपाध्यक्ष अरूण कदम यांच्यावर जबाबदारी सोपवली. मात्र पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज होऊन सेनेत सामील झाले. उरलेसुरले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोट बांधून शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी प्रयत्न सुरु केले. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावर ठाकरे यांनी मनसैनिकांना लढण्याचे निर्देश दिले. पक्षाची स्थिती नाजूक असली तरी निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सक्षम उमेदवार मिळत नसले तरी निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे. तसेच इतर पक्षातील पदाधिकारी देखील पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे ३० इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय तूर्तास घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत मते विभागणीसाठी मनसेचा वापर काही बड्या राजकीय पक्षांकडून केला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेने मात्र त्याला भीक न घालण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हे खरे असले तरी ऐन निवडणुकीच्यावेळेत काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.