शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बडोदा बँक लुटणारे चौघे अद्यापही फरार, खोदकाम करणारे मजूर, मुद्देमाल जप्तीचे पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:58 IST

बडोदा बँक लुटणा-या टोळीचा पर्दाफाश करूनही अद्याप चौघे जण पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चौघेही मजूर कामगार असून, त्यांनी भुयाराचे खोदकाम केले होते.

नवी मुंबई : बडोदा बँक लुटणा-या टोळीचा पर्दाफाश करूनही अद्याप चौघे जण पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चौघेही मजूर कामगार असून, त्यांनी भुयाराचे खोदकाम केले होते. या कामी त्यांनाही एक किलो सोने दिल्याची मुख्य सूत्रधाराने पोलिसांकडे कबुली दिल्याने पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याच्या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीनच दिवसांत ११ जणांसह टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला. बँकेखालून सुमारे ३० फूट लांब भुयार खोदून लॉकर फोडण्यात आले होते. टोळीचा मुख्य सूत्रधार हाजीद अली मिर्जा बेग याने भुयार खोदण्यासाठी दीपक मिश्रा याची मदत घेतली होती. त्यानुसार मिश्रा याने उत्तरप्रदेशमधील तिघा साथीदारांना बोलावून घेतले होते. त्यांनीच सोबत आणलेल्या उत्तरप्रदेशातील गुटखा व वृत्तपत्रामुळे हा गुन्हा उघड करण्यास पोलिसांना मदत मिळाली. मात्र, गुन्हा केल्यानंतर सूत्रधार बेग याच्यासह ११ जण पोलिसांच्या हाती लागले आहेत; परंतु भुयार खोदणाºया त्या चौघांपर्यंत मात्र पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत.गुन्ह्यानंतर चोरीच्या मुद्देमालाच्या वाटणीत सदर चौघांना एक किलो सोने दिल्याची कबुली बेग याने पोलिसांना दिली आहे. मात्र, ते हाती लागले तरच जप्तीचा मुद्देमाल वाढू शकतो. यानुसार मिश्रा व त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांच्या पथकाने त्यांच्या उत्तरप्रदेशातील राहत्या घरासह इतरही संशयित ठिकाणी झडाझडती घेतली. यानंतरही त्यांच्याविषयीची ठोस माहिती हाती लागलेली नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा