शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 29, 2015 00:41 IST

शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती.

शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सातारा, पुणे व इतर ठिकाणांवरून ढोल पथकांना बोलावले होते. सायंकाळी वाशी, नेरूळ,कोपरखैरणे परिसरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. पहाटे चारपर्यंत ७,५०८ घरगुती व ५१९ सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणरायांवर महापालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. वाशीमध्ये शिवसेनेचे विठ्ठल मोरे, भारतीय जनता पक्ष व इतर सामाजिक संस्थांनी गणेशभक्तांसाठी चहा, अल्पोपहाराची सोय केली होती. शहरातील सर्व तलावांवर विशेष खबरदारी घेण्यात येत होती. अग्निशमन दलाचे जवान व पोहता येणाऱ्या स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. -स्वयंसेवकांविषयी नाराजीशहरातील काही विसर्जन तलावांवर स्वयंसेवक गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविकांकडून पैशांची मागणी करत होते. ३०० ते ५०० रुपयांची मागणी केली जात होती. मोठ्या मंडळांकडून ५ हजार रुपये मागितले जात होते. याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक स्वयंसेवक चांगले काम करतात परंतु ठरावीक पैशांसाठी अडवणूक करणाऱ्यांमुळे सर्वांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. ---खाडीत बंदीवाशी खाडीमध्ये यावर्षी मानखुर्दमधील गणरायांना विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाशी गावातील फक्त तीन गणेशमूर्तींचेच खाडीत विसर्जन करण्यात आले. -----नेरूळमध्ये एका गणेशमूर्तीचे वजन जास्त असल्यामुळे तराफ्यावर ठेवता येत नव्हती. यामुळे जवळपास तीन तास विसर्जन थांबवावे लागले होते. अखेर क्रेन मागवून गणेशमूर्तीला तराफ्यावर ठेवण्यात आले. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले. महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनीही विसर्जन परिसरात मध्यरात्रीपर्यंत उपस्थिती दर्शविली होती.----------वडाळे तलाव , आदई तलाव, कोळीवाडा, गाढी नदीच्या विविध ठिकाणच्या पात्रात, कोपरा तलाव आदी ठिकाणी मोठ्या संख्येत विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पनवेलमध्ये १९७१, नवीन पनवेल २८८९, खांदेश्वर १७८९, कळंबोली ९२०, कामोठे २१०७, खारघर ४३०१ आदी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील ३ हजारांपेक्षा जास्त मूर्ती यावेळी विसर्जित करण्यात आल्या. ---------खारघरमध्ये डाँ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने निर्माल्यापासून कपोस्ट खत निर्मितीचा उपक्रम राबविला. शहरातील ३ विसर्जन ठिकाणांवर १२९ स्वयंसेवकांची नेमणूक करुन साडेपाच टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन निर्माल्यापासून तयार होणारे कपोस्ट खत खारघरमध्ये प्रतिष्ठानने केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरले जाणार आहे.