शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 29, 2015 00:41 IST

शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती.

शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सातारा, पुणे व इतर ठिकाणांवरून ढोल पथकांना बोलावले होते. सायंकाळी वाशी, नेरूळ,कोपरखैरणे परिसरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. पहाटे चारपर्यंत ७,५०८ घरगुती व ५१९ सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणरायांवर महापालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. वाशीमध्ये शिवसेनेचे विठ्ठल मोरे, भारतीय जनता पक्ष व इतर सामाजिक संस्थांनी गणेशभक्तांसाठी चहा, अल्पोपहाराची सोय केली होती. शहरातील सर्व तलावांवर विशेष खबरदारी घेण्यात येत होती. अग्निशमन दलाचे जवान व पोहता येणाऱ्या स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. -स्वयंसेवकांविषयी नाराजीशहरातील काही विसर्जन तलावांवर स्वयंसेवक गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविकांकडून पैशांची मागणी करत होते. ३०० ते ५०० रुपयांची मागणी केली जात होती. मोठ्या मंडळांकडून ५ हजार रुपये मागितले जात होते. याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक स्वयंसेवक चांगले काम करतात परंतु ठरावीक पैशांसाठी अडवणूक करणाऱ्यांमुळे सर्वांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. ---खाडीत बंदीवाशी खाडीमध्ये यावर्षी मानखुर्दमधील गणरायांना विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाशी गावातील फक्त तीन गणेशमूर्तींचेच खाडीत विसर्जन करण्यात आले. -----नेरूळमध्ये एका गणेशमूर्तीचे वजन जास्त असल्यामुळे तराफ्यावर ठेवता येत नव्हती. यामुळे जवळपास तीन तास विसर्जन थांबवावे लागले होते. अखेर क्रेन मागवून गणेशमूर्तीला तराफ्यावर ठेवण्यात आले. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले. महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनीही विसर्जन परिसरात मध्यरात्रीपर्यंत उपस्थिती दर्शविली होती.----------वडाळे तलाव , आदई तलाव, कोळीवाडा, गाढी नदीच्या विविध ठिकाणच्या पात्रात, कोपरा तलाव आदी ठिकाणी मोठ्या संख्येत विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पनवेलमध्ये १९७१, नवीन पनवेल २८८९, खांदेश्वर १७८९, कळंबोली ९२०, कामोठे २१०७, खारघर ४३०१ आदी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील ३ हजारांपेक्षा जास्त मूर्ती यावेळी विसर्जित करण्यात आल्या. ---------खारघरमध्ये डाँ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने निर्माल्यापासून कपोस्ट खत निर्मितीचा उपक्रम राबविला. शहरातील ३ विसर्जन ठिकाणांवर १२९ स्वयंसेवकांची नेमणूक करुन साडेपाच टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन निर्माल्यापासून तयार होणारे कपोस्ट खत खारघरमध्ये प्रतिष्ठानने केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरले जाणार आहे.