शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बांगलादेशींकडे मतदान ओळखपत्र, आधारसह पॅनकार्डही आढळले; नवी मुंबईत चौघांना अटक

By नामदेव मोरे | Updated: May 29, 2024 18:40 IST

बेनापोल बोनगा सीमेवरून भारतात घुसखोरी : २० वर्षे देशात वास्तव्य

नवी मुंबई : गुन्हे शाखेने करावे गावात छापा टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बेनापोल बोनगा सीमेवरून भारतात घुसखोरी करून जवळपास २० वर्षांपासून ते नवी मुंबई व इतर ठिकाणी वास्तव्य करत होते. त्यांच्याकडे आधार व पॅनकार्डही आढळून आले असून, मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

अटक केलेल्यांमध्ये रूकसाना नुरूल इस्लाम शेख (वय ३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरूल इस्लाम शेख (३०) यांचा समावेश आहे. हे चारही जण करावेगाव सेक्टर ३६ मध्ये वास्तव्य करत होते. ते मूळचे बांगलादेशमधील जोशोर, नोडाईल, खुल्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या सर्वांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड व मोबाइल फोन आढळून आले आहेत. त्यांच्या मोबाइलमध्ये ईमो नावाचे ॲप्लिकेशन आढळून आले. त्यामध्ये बांगलादेशमधील फोन नंबरवर कॉल व बांगलादेशी भाषेत चॅटिंग केल्याचेही आढळून आले आहे. व्हॉट्सॲपमध्येही बांगलादेशमधील नंबर आढळून आले असून, त्यांच्याबरोबर नियमित संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. संशयितांना माहिती विचारली असता तिघांनी बेनापोल बोनगा सीमेवरून देशात घुसखोरी केल्याचे सांगितले. बांगलादेशमधील गरिबीला कंटाळून भारतामध्ये आल्याचे व येथून पुन्हा गावी नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्याचेही सांगितले. याविषयी पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोणी कधी घुसखोरी केलीनुरूल शेख२००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र काढले आहे. मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांशी नियमित संपर्क.

उंजिला शेख२०१२ मध्ये पासपोर्ट काढून भारतामध्ये आली. पुन्हा गावी गेली नाही. आधार, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र आहे.

रॉनी शेख२००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशमध्ये जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. आधारसह सर्व कागदपत्रे आहेत.

पिंकी शेख२००५-०६ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून घुसखोरी. २०१० मध्ये पुन्हा बांगलादेशला जाऊन भारतामध्ये परत आली. मोबाइल, आधार, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रही आहे.