शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

नेरूळमधून बांग्लादेशी कुटुंबाला अटक, १७ वर्षांपासून होते वास्तव्य

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 28, 2024 18:55 IST

बनावट कागदपत्राद्वारे मिळवला आश्रय

नवी मुंबई : १७ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी कुटुंबावर नेरुळ पोलिसांनी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नेरूळमध्ये आश्रय मिळवला होता. पती, पत्नी व दोन मुले अशा चौघांचा यामध्ये समावेश आहे. 

नेरुळ परिसरात काही बांग्लादेशी व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पोलिसांकडून परिसरातील संशयित नागरिकांची चाचपणी सुरु होती. त्यामध्ये सेक्टर १५ येथील एनएल २ वसाहतीमध्ये एका कुटुंबाची पाहणी करण्यात आली. यावेळी एका व्यक्तीने पोलिसांना दाखवलेल्या कागदपत्रांवर संशय आला. त्यामुळे कुटुंबाची कागदपत्रे तपासणी केली असता ते मूळचे बांग्लादेशी असून भारतात घुसखोरी करून आले असल्याचे समोर आले. त्यानुसार अब्दुल शेख (५५), तेहमीना शेख (४२), हलीमा शेख यांच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात आल्यावर त्यांना मुलगा देखील झाला असून तो १२ वर्षाचा आहे. त्याला देखील पोलिस कुटुंबियांसोबत बांग्लादेश येथे पाठवणार आहेत. 

नेरुळ परिसरातील एका कुटुंबाकडे तेहमीना हि १० वर्षांपासून घरकाम करत आहे. तर अब्दुल हा देखील परिसरात मिळेल ते काम करतो. मागील दहा वर्षात त्यांनी नेरुळ परिसरात ठिकठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्य केले आहे. गावठाणांमध्ये कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता भाड्याने घर मिळवून ते राहत होते. २००८ मध्ये हे कुटुंब घुसखोरी करून भारतात आले आहे. तेंव्हापासून मागील १७ वर्षे ते पोलिसांची नजर चुकवून भारतात वास्तव्य करत होते. दरम्यान त्यांच्या संपर्कात भारतातील इतरही घुसखोर बांग्लादेशी आहेत का याचा अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBangladeshबांगलादेश