शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आगरी-कोळी भवन समस्यांच्या विळख्यात; सिडकोचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:23 IST

प्रशस्त मजला वापराविना धूळखात; स्वच्छतेचा अभाव

- अनंत पाटीलनवी मुंबई : शहरातील मूळ निवासी आगरी-कोळी बांधवाच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून पामबीच मार्गावर नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी भवन उभारण्यात आले आहे; परंतु नियमित देखभालीअभावी या भवनची दुरवस्था झाली आहे. समस्यांचा विळखा पडला आहे. या वस्तूचा एक प्रशस्त मजला वापराविना धूळखात पडला आहे. या परिस्थितीकडे सिडकोच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने स्थानिक आगरी-कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई आणि पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापूर आणि खारघर ते पनवेल परिसरात आगरी-कोळी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. नवी मुंबईचे स्थानिक रहिवासी असलेल्या या भूमिपुत्रांच्या शेतजमिनीवर नवी मुंबई शहर वसले आहे. शहरीकरणामुळे येथील मूळ संस्कृती लोप पावली आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने नऊ वर्षांपूर्वी नेरुळ येथे आगरी-कोळी भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या भवनचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

या भवनमुळे आगरी-कोळी समाजाची मूळ संस्कृतीची शहरवासीयांना ओळख राहील, हा यामागचा उद्दात हेतू होता. भवनची वास्तू सुबक व आकर्षक असली तरी तिच्या नियमित देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रशस्त वास्तूमध्ये तळमजल्यावर वाहनतळ तसेच लग्नसमारंभासाठी जेवणाची व्यवस्था व कार्यालय आहे. मात्र, येथील स्वच्छतागृह आणि सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे.

बेसीनमधील नळाला पाणीच नाही, शौचालयातील नळ गायब आहेत. तर भिंतीच्या लाद्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालयाची भांडी फुटलेली आहेत. दरवाजाची कडीकोयंडा तुटल्यामुळे अक्षरश: दरवाजा दोरीने बांधण्याची वेळ येथील व्यवस्थापनावर आलेली आहे.आगरी-कोळी भवनमध्ये लग्नसोहळ्यासह विविध कार्यक्रम होतात. मंगळवारी या ठिकाणी एक लग्नसोहळा होता. येथील गैरसोयींचा वाईट अनुभव आला. त्यानुसार वधूवरांच्या वºहाडी मंडळीने सदर बाब तेथील कार्यालयीन सहायक आर. पी. तवले यांच्या निदर्शनास आणून दिली असता यासंदर्भात सिडकोच्या संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ५०० आसन क्षमता असलेले सभागृह तर दुसºया मजल्यावर लग्न कार्यालय आहे. या इमारतीचा पहिला मजला हा खास आगरी-कोळी संस्कृती जपण्यासाठी ठेवण्यात आला. येथे या समाजाची वापरात आलेली हत्यारे, शेतीसाठीची अवजारे, मासेमारीसाठी लागणारी जाळी, शेती व वापराच्या विविध वस्तू यांचे संग्रहालय तसेच आगरी-कोळी साहित्यासाठी ग्रंथालय नियोजित करण्यात आले होते; परंतु नऊ वर्षे उलटली तरी यापैकी कोणत्याही गोष्टीची पूर्तता झाली नसल्याचे दिसून आले आहे.

आगरी कोळी भवनच्या तळमजल्यावरील दुरुस्ती विषयी त्वरित पाहणी करून तसा अहवाल संबंधित विभागाला पाठविण्यात येईल. तसेच भवनमध्ये आगरी-कोळी समाजाची रूढी-परंपरा सास्कृतिक ओळख असलेली अवजारे आणि विविध वस्तू संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.- मंगलसिंग महाले, कार्यकारी अभियंता,सिडको

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र