शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
4
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
5
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
6
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
7
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
8
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
9
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
10
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
12
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
13
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
14
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
15
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
16
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
17
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
18
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
19
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
20
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

आंबा मार्केटमधील मुहूर्ताकडे लक्ष

By admin | Updated: April 8, 2016 01:58 IST

देशात सर्वाधिक आंबा विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. फेब्रुवारीपासून मार्केटमध्ये आवक सुरू होत असली तरी खरा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होत

नवी मुंबई : देशात सर्वाधिक आंबा विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. फेब्रुवारीपासून मार्केटमध्ये आवक सुरू होत असली तरी खरा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होत असल्याने शुक्रवारी नववर्षानिमित्त किती आवक होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. फळांच्या राजाचा हंगाम यावर्षी लवकर सुरू झाला असला तरी यावर्षी आवक कमी असतानाही भाव चांगला मिळत नाही. सद्यस्थितीमध्ये ४० हजार पेट्यांची आवक होत आहे. यामध्ये कर्नाटक व आंध्रप्र्रदेशमधून १५ हजार व कोकणातून २५ हजार पेट्यांची आवक होत आहे. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ४ ते ८ डझनच्या पेटीला १५०० ते ५ हजार रूपये बाजारभाव मिळत होता. परंतु यावर्षी हेच दर १ हजार ते ३५०० एवढे आहेत. दक्षिणेकडील माल एक महिना लवकर बाजारात आल्यामुळे कोकणच्या हापूसचे दर घसरले आहेत. शुक्रवारी मार्केटमध्ये किती माल येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे यापुढे ग्राहकांकडून मागणी वाढेल असा अंदाज बांधला जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा असे आवाहन केले आहे.