शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

आंबा मार्केटमधील मुहूर्ताकडे लक्ष

By admin | Updated: April 8, 2016 01:58 IST

देशात सर्वाधिक आंबा विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. फेब्रुवारीपासून मार्केटमध्ये आवक सुरू होत असली तरी खरा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होत

नवी मुंबई : देशात सर्वाधिक आंबा विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. फेब्रुवारीपासून मार्केटमध्ये आवक सुरू होत असली तरी खरा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होत असल्याने शुक्रवारी नववर्षानिमित्त किती आवक होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. फळांच्या राजाचा हंगाम यावर्षी लवकर सुरू झाला असला तरी यावर्षी आवक कमी असतानाही भाव चांगला मिळत नाही. सद्यस्थितीमध्ये ४० हजार पेट्यांची आवक होत आहे. यामध्ये कर्नाटक व आंध्रप्र्रदेशमधून १५ हजार व कोकणातून २५ हजार पेट्यांची आवक होत आहे. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ४ ते ८ डझनच्या पेटीला १५०० ते ५ हजार रूपये बाजारभाव मिळत होता. परंतु यावर्षी हेच दर १ हजार ते ३५०० एवढे आहेत. दक्षिणेकडील माल एक महिना लवकर बाजारात आल्यामुळे कोकणच्या हापूसचे दर घसरले आहेत. शुक्रवारी मार्केटमध्ये किती माल येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे यापुढे ग्राहकांकडून मागणी वाढेल असा अंदाज बांधला जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा असे आवाहन केले आहे.