शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

चळवळ संपवण्याचा होतोय प्रयत्न, आंबेडकरी संघटनांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:05 IST

आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला.

नवी मुंबई : आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला. महाराष्टÑ बंदच्या दरम्यान आंदोलनात सहभागी नसलेल्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तर काही ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण हे त्रयस्थ व्यक्तींनी केलेले सूडबुद्धीचे राजकारण असल्याचाही त्यांचा आरोप आहे.भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह नवी मुंबईतही ठिकठिकाणी भीमसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या दरम्यान, एपीएमसीमधील दोन गटांतील वाद व रबाळेतील हाणामारी वगळता इतर कुठे आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही; परंतु आंदोलनाच्या दुसºया दिवसापासून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून, आंदोलनात सहभागी नसलेल्यांनाही अटक केली जात असल्याचा आरोप जिल्हाअध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकरी विचारांच्या पक्षांच्या वतीने वाशी येथे ही परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारिपचे अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे ख्वाजामिया पटेल, संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत, विजय कांबळे, यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. पोलिसांनी अद्यापपर्यंत १२५ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७५ जणांना न्यायालयातून, तर २० जणांना टेबल जामीन मिळालेला आहे; परंतु जे आंदोलनात सहभागी नव्हते, अशांनाही अटक करून आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा घाट असल्याचाही आरोप ओहोळ यांनी केला. यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात असल्याची चिंता भारिपचे अरुण गायकवाड यांनी व्याक्त केली. तर महाराष्टÑ बंदच्या दरम्यान शांततेत आंदोलने होत असताना, त्रयस्थ संघटनांनी दंगे घडवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत यांनी केला.