शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चळवळ संपवण्याचा होतोय प्रयत्न, आंबेडकरी संघटनांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:05 IST

आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला.

नवी मुंबई : आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला. महाराष्टÑ बंदच्या दरम्यान आंदोलनात सहभागी नसलेल्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तर काही ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण हे त्रयस्थ व्यक्तींनी केलेले सूडबुद्धीचे राजकारण असल्याचाही त्यांचा आरोप आहे.भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह नवी मुंबईतही ठिकठिकाणी भीमसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या दरम्यान, एपीएमसीमधील दोन गटांतील वाद व रबाळेतील हाणामारी वगळता इतर कुठे आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही; परंतु आंदोलनाच्या दुसºया दिवसापासून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून, आंदोलनात सहभागी नसलेल्यांनाही अटक केली जात असल्याचा आरोप जिल्हाअध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकरी विचारांच्या पक्षांच्या वतीने वाशी येथे ही परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारिपचे अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे ख्वाजामिया पटेल, संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत, विजय कांबळे, यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. पोलिसांनी अद्यापपर्यंत १२५ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७५ जणांना न्यायालयातून, तर २० जणांना टेबल जामीन मिळालेला आहे; परंतु जे आंदोलनात सहभागी नव्हते, अशांनाही अटक करून आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा घाट असल्याचाही आरोप ओहोळ यांनी केला. यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात असल्याची चिंता भारिपचे अरुण गायकवाड यांनी व्याक्त केली. तर महाराष्टÑ बंदच्या दरम्यान शांततेत आंदोलने होत असताना, त्रयस्थ संघटनांनी दंगे घडवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत यांनी केला.