शहरं
Join us  
Trending Stories
1
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
4
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
5
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
6
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
7
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
8
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
9
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
10
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
11
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
12
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
13
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
14
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
15
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
16
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
17
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
18
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
19
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
20
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखविणारी टोळी अटकेत

By admin | Updated: February 23, 2017 06:39 IST

एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या

नवी मुंबई : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख रु पये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले पाचही जण उच्च शिक्षित असून त्यापैकी एकाला यापूर्वी अशाच गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. सानपाडा येथील द एस्पिरेशन नावाच्या कार्यालयातून हा कट रचला गेला होता. काही तरु णांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोपरखैरणे येथे भाड्याने घर घेतले होते. यानंतर त्यांनी दलालाच्या मदतीने सानपाडा रेल्वेस्थानकात भाड्याने कार्यालय घेतले होते. त्याठिकाणी काही तरु णींना नोकरीला ठेवून त्यांच्यामार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना फोनवरून संपर्क साधला जात होता. यानुसार कार्यालयात संपर्क साधणाऱ्या पालकांना पुणेतील काशीबाई नवले, नेरु ळचे तेरणा कॉलेज व इंदोर येथील अरविंद मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसकरिता प्रवेश मिळवून देण्याची हमी दिली जात होती. तर इच्छुक असणाऱ्या पालकांकडून अ‍ॅडमिशनकरिता चेक, डीडी किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारली जात होती. त्यांच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी पैसे दिले होते. मात्र सप्टेंबर २०१६ मध्ये कार्यालय बंद करून त्यांनी पळ काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सानपाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोठे रॅकेट सक्रि य असल्याच्या शक्यतेमुळे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने तपासाला सुरवात केली होती. त्याकरिता उपायुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, हवालदार अजय मोरे यांचे तपासपथक तयार करण्यात आले होते. त्यांनी राजस्थानमधून पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. अभिषेक आशुतोष झा, सौरभ शीतलप्रसाद सिंग, गौरव शीतलप्रसाद सिंग, सुशीलकुमार सुहासचंद्र वर्मा व हेमंद्र भद्र सरकार अशी त्यांची नावे आहेत. गौरव हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. त्याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना अशा मॅनेजमेंट कोट्यातून काहींना प्रवेश मिळवून दिला होता. परंतु यामध्ये घोटाळा झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. तर यामध्ये बदनामी झाल्यामुळे वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. अखेर शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व बारचे छंद जोपासण्याकरिता त्यांनी ही शक्कल लढवली होती. यानुसार त्यांनी १७ जणांना तीन कोटी रु पयांचा गंडा घातला होता. परंतु ही रक्कम ज्या ज्या बँक खात्यात वाटली, त्या खात्यांची कसून चौकशी केली असता, या टोळीचा भांडाफोड झाल्याचे कौसडीकर यांनी सांगितले. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किमतीचाच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले सर्वजण उच्च शिक्षित आहेत.