शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखविणारी टोळी अटकेत

By admin | Updated: February 23, 2017 06:39 IST

एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या

नवी मुंबई : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख रु पये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले पाचही जण उच्च शिक्षित असून त्यापैकी एकाला यापूर्वी अशाच गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. सानपाडा येथील द एस्पिरेशन नावाच्या कार्यालयातून हा कट रचला गेला होता. काही तरु णांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोपरखैरणे येथे भाड्याने घर घेतले होते. यानंतर त्यांनी दलालाच्या मदतीने सानपाडा रेल्वेस्थानकात भाड्याने कार्यालय घेतले होते. त्याठिकाणी काही तरु णींना नोकरीला ठेवून त्यांच्यामार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना फोनवरून संपर्क साधला जात होता. यानुसार कार्यालयात संपर्क साधणाऱ्या पालकांना पुणेतील काशीबाई नवले, नेरु ळचे तेरणा कॉलेज व इंदोर येथील अरविंद मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसकरिता प्रवेश मिळवून देण्याची हमी दिली जात होती. तर इच्छुक असणाऱ्या पालकांकडून अ‍ॅडमिशनकरिता चेक, डीडी किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारली जात होती. त्यांच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी पैसे दिले होते. मात्र सप्टेंबर २०१६ मध्ये कार्यालय बंद करून त्यांनी पळ काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सानपाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोठे रॅकेट सक्रि य असल्याच्या शक्यतेमुळे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने तपासाला सुरवात केली होती. त्याकरिता उपायुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, हवालदार अजय मोरे यांचे तपासपथक तयार करण्यात आले होते. त्यांनी राजस्थानमधून पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. अभिषेक आशुतोष झा, सौरभ शीतलप्रसाद सिंग, गौरव शीतलप्रसाद सिंग, सुशीलकुमार सुहासचंद्र वर्मा व हेमंद्र भद्र सरकार अशी त्यांची नावे आहेत. गौरव हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. त्याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना अशा मॅनेजमेंट कोट्यातून काहींना प्रवेश मिळवून दिला होता. परंतु यामध्ये घोटाळा झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. तर यामध्ये बदनामी झाल्यामुळे वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. अखेर शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व बारचे छंद जोपासण्याकरिता त्यांनी ही शक्कल लढवली होती. यानुसार त्यांनी १७ जणांना तीन कोटी रु पयांचा गंडा घातला होता. परंतु ही रक्कम ज्या ज्या बँक खात्यात वाटली, त्या खात्यांची कसून चौकशी केली असता, या टोळीचा भांडाफोड झाल्याचे कौसडीकर यांनी सांगितले. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किमतीचाच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले सर्वजण उच्च शिक्षित आहेत.