शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखविणारी टोळी अटकेत

By admin | Updated: February 23, 2017 06:39 IST

एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या

नवी मुंबई : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख रु पये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले पाचही जण उच्च शिक्षित असून त्यापैकी एकाला यापूर्वी अशाच गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. सानपाडा येथील द एस्पिरेशन नावाच्या कार्यालयातून हा कट रचला गेला होता. काही तरु णांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोपरखैरणे येथे भाड्याने घर घेतले होते. यानंतर त्यांनी दलालाच्या मदतीने सानपाडा रेल्वेस्थानकात भाड्याने कार्यालय घेतले होते. त्याठिकाणी काही तरु णींना नोकरीला ठेवून त्यांच्यामार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना फोनवरून संपर्क साधला जात होता. यानुसार कार्यालयात संपर्क साधणाऱ्या पालकांना पुणेतील काशीबाई नवले, नेरु ळचे तेरणा कॉलेज व इंदोर येथील अरविंद मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसकरिता प्रवेश मिळवून देण्याची हमी दिली जात होती. तर इच्छुक असणाऱ्या पालकांकडून अ‍ॅडमिशनकरिता चेक, डीडी किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारली जात होती. त्यांच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी पैसे दिले होते. मात्र सप्टेंबर २०१६ मध्ये कार्यालय बंद करून त्यांनी पळ काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सानपाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोठे रॅकेट सक्रि य असल्याच्या शक्यतेमुळे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने तपासाला सुरवात केली होती. त्याकरिता उपायुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, हवालदार अजय मोरे यांचे तपासपथक तयार करण्यात आले होते. त्यांनी राजस्थानमधून पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. अभिषेक आशुतोष झा, सौरभ शीतलप्रसाद सिंग, गौरव शीतलप्रसाद सिंग, सुशीलकुमार सुहासचंद्र वर्मा व हेमंद्र भद्र सरकार अशी त्यांची नावे आहेत. गौरव हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. त्याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना अशा मॅनेजमेंट कोट्यातून काहींना प्रवेश मिळवून दिला होता. परंतु यामध्ये घोटाळा झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. तर यामध्ये बदनामी झाल्यामुळे वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. अखेर शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व बारचे छंद जोपासण्याकरिता त्यांनी ही शक्कल लढवली होती. यानुसार त्यांनी १७ जणांना तीन कोटी रु पयांचा गंडा घातला होता. परंतु ही रक्कम ज्या ज्या बँक खात्यात वाटली, त्या खात्यांची कसून चौकशी केली असता, या टोळीचा भांडाफोड झाल्याचे कौसडीकर यांनी सांगितले. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किमतीचाच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले सर्वजण उच्च शिक्षित आहेत.