शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

एटीएम केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर; ग्राहकांच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 03:03 IST

नवी मुंबई शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक एटीएम केंद्रांची आणि केंद्राचा वापर करणाºया नागरिकांची सुरक्षा वाºयावर आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक एटीएम केंद्रांची आणि केंद्राचा वापर करणाºया नागरिकांची सुरक्षा वाºयावर आहे. बँकांच्या शाखांजवळील एटीएम केंद्र वगळल्यास इतर एटीएम केंद्रांजवळ सुरक्षारक्षकही नसून, नागरिकांच्या आणि एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने सुरक्षा फक्त नावापुरतीच आहे, हे शहरात मागील काळात घडलेल्या काही घटनांवरून निष्पन्न झाले आहे.नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. देशामधील विविध राज्यांतील नागरिक कामानिमित्त नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहेत. अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाºया शहरात राज्यात आणि देशात असलेल्या सर्वच बँकांच्या शाखा आणि नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने नवनवीन एटीएम सेंटर उघडण्यात आली आहेत. एटीएम मशिनमध्ये लाखोंच्या पटीने पैसे असतात, त्यामुळे ग्राहकांसह एटीएम सेंटरची सुरक्षा अधिक कडक असणे खूपच गरजेचे आहे; परंतु अनेक एटीएम सेंटरजवळ सुरक्षारक्षकही नाहीत, तसेच नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी एटीएम मशिन फोडणे, एटीएम मशिनमधून पैसे काढलेल्या नागरिकांची लूट करणे, एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून ग्राहकांची फसवणूक होणे, असे अनेक प्रकार घडले असून या प्रकारानंतर संबंधित एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शहरात काही एटीएम सेंटर नागरिकांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी आहेत, त्यामुळे अशा एटीएम सेंटरमध्ये जाणाºया विशेष करून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच एटीएम सेंटरमध्ये सतत सुरक्षारक्षक असणे आवश्यक असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने बँकांना ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत काहीच सोयर सुतक नसल्याचे चित्र समोर आले आहे.काही एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक तैनात आहेत; परंतु त्यांच्याकडे सुरक्षेसाठी कोणतेही शस्त्र नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षारक्षक चोरांचा सामना कसा करणार, हा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.जानेवारीत घडलेल्या घटना५ जानेवारी रोजी नेरु ळ रेल्वे स्थानकासमोरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशिनची चोरट्यांनी तोडफोड केली होती. या वेळी तपासात एटीएममधील कॅमेरे बंद असल्याचे निष्पन्न झाले होते. परिसरातील दुकानांबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांचा आधार घेऊन पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.१0 जानेवारी रोजी पनवेलमध्ये एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून एटीएम कार्ड बदलण्यात आले आणि १0 हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.१५ जानेवारी रोजी कोपरखैरणे येथे एका खातेदाराची बनावट एटीएम कार्ड बनवून त्यांच्या खात्यामधील चार लाख ५0 हजार रु पये हडप केल्याची घटना घडली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अग्निसुरक्षा यंत्रणेकडे डोळेझाकएटीएम केंद्रात अग्निसुरक्षेची यंत्रणा सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी असणे गरजेचे असताना अनेक एटीएम सेंटरमध्ये प्रत्यक्षात अग्निशमन यंत्रणा नसून अनेक ठिकाणच्या अग्निसुरक्षा यंत्रणा बंद पडल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विभागाची मदत उपलब्ध होईपर्यंत कोणतीही उपाययोजना करणे शक्य नाही.दरवाजा नादुरु स्तीमुळे भटक्या कुत्र्यांचे वास्तव्यएटीएम सेंटरमध्ये कार्डधारकालाच प्रवेश करता यावा, यासाठी एटीएम केंद्राच्या दरवाजाजवळ कार्ड स्वाइप करण्याची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे; परंतु अनेक एटीएम सेंटरजवळ बसविण्यात आलेल्या स्वाइप मशिन बंद आहेत. त्यामुळे या स्वाइप मशिनचा काहीही उपयोग होत नाही. अनेक एटीएम केंद्रांचे दरवाजा नादुरु स्त असल्याने उघडेच असतात. त्यामुळे या ठिकाणी भटके कुत्रे बसलेले दिसतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई