शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात, ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक

By नारायण जाधव | Updated: March 7, 2024 14:44 IST

सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला; ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक

नवी मुंबई : सिडकोने प्रस्तावित केलेला अटल सेतू ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा थेट सात किलोमीटर लांबीचा नवा सागरी मार्ग आता लवकरच साकारला जाणार आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली  असून, जे. कुमार कंपनीने बाजी जिंकली आहे. 

सिडकोने या सागरी रस्त्यासाठी आधी ६८१ कोटी ६३ लाख रुपये खर्च प्रस्तावित केला होता; मात्र आता परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने तो २३० कोटींनी वाढून ९१२ कोटी २८ लाखांवर गेला आहे. ३० महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे बंधनकारक आहे. सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचा येण्या-जाण्याचा मार्ग, खाडी प्रदूषण होऊन त्यांच्यावर परिणाम व्हायला नको, याची दक्षता सिडकोस घ्यावी लागणार आहे. 

असा असेल सागरी मार्गअटल सेतू जंक्शनपासून ते आम्र मार्ग जंक्शनपर्यंत तो बांधण्यात येणार असून, त्याची लांबी सात किमी इतकी आहे. यात मूळ रस्ता ५.८ किमी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे.

नवी मुुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची एक मार्गिका उलवेजवळच्या शिवाजीनगर येथे तर दुसरी मार्गिका चिर्ले जंक्शनजवळ उतरवली आहे. शिवाजीनगर मार्गिकेवरून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी सिडको ७ किमीचा सागरी मार्ग बांधत आहे. 

काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतुकीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्याच्या पाम बीच रोड, आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गावरून विमानतळाच्या दिशेने डाव्या बाजूला नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीही मार्गिका असणार आहे. यामुळे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गावरून बेलापूर, नेरुळ, सीवूड, सानपाडातील प्रवाशांनाही सोयीचा ठरणार. 

जळगाव जिल्ह्यात वृक्षांची लागवडमार्गाच्या कामासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून, त्यासाठी पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे. या नुकसानीच्या बदल्यात शेवरे खुर्द, ता. पारोळा, जि. जळगाव येथे देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड सिडको करणार आहे.

वन्यप्राण्यांच्या जीवनमानावरील परिणामांचा अभ्यासहा मार्ग फ्लेमिंगोंच्या अधिवास क्षेत्रातून जात असल्याने बांधकाम सुरू असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही दोन वर्षांपर्यंत त्याच्यामुळे फ्लेमिंगो पक्षांसह वन्यप्राण्यांच्या जीवनमानावर काय  परिणाम झाले, याचे निरीक्षण  झुनझुनवाला महाविद्यालयाकडून करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना वने आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी देताना केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ