शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बालनाट्य स्पर्धेला कलाकारांच्या कार्यशाळेचे स्वरूप; कोकण विभागातून ६०० बालकलाकारांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:13 IST

शासनाच्या बालनाट्य स्पर्धेला कलाकार घडविणा-या कार्यशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकण विभागीय स्पर्धेमध्ये तब्बल ६३ नाटके सादर केली जाणार असून ६०० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले आहेत. स्पर्धेतून चांगले बालकलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई : शासनाच्या बालनाट्य स्पर्धेला कलाकार घडविणाºया कार्यशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकण विभागीय स्पर्धेमध्ये तब्बल ६३ नाटके सादर केली जाणार असून ६०० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले आहेत. स्पर्धेतून चांगले बालकलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.जानेवारी महिन्यात शाळेमध्ये वार्षिक स्रेहसंम्मेलनाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. विद्यार्थीही मनापासून या महोत्सवामध्ये सहभागी होवून त्यांच्यामधील कलागुण सादर करत असतात. परंतु सर्व कलागुण वार्षिक महोत्सवापुरतेच मर्यादित रहात असतात. विद्यार्थ्यांना शाळेबाहेर व्यासपीठ उपलब्ध होत नाही. यामुळेच राज्य शासनाच्यावतीने बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यातील सहा झोनमध्ये ८ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू आहे. मुंबई, पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील विभागीय स्पर्धा वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात सुरू आहे. चार जिल्ह्यातून तब्बल ६३ टीमने स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १८ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाºया नाटकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.नाट्य स्पर्धेच्या दुसºया दिवशी नेरूळमधील तेरणा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मला उत्तर हवं हे सुनील मळेकर यांनी लिहिलेले नाटक सादर केले. जाती, धर्माच्या नावाखाली समाजामध्ये निर्माण होत असलेली दुही व महिलांवर होणारे अत्याचार हा विषय असलेल्या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय वाचवाल तर वाचाल, इथं उजाडत नाही, एक हिरवी गोष्ट, गुरू साक्षात परब्रम्ह, आकार व घरटं या नाटकांचाही सहभाग होता. सर्वच नाटके दर्जेदारपणे सादर केली जात असून विद्यार्थी मनापासून त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका सादर करत आहेत. या नाट्य स्पर्धेतून भविष्यात चांगले कलाकार घडतील असा विश्वास स्पर्धा पाहण्यासाठी आलेले शिक्षक, पालक व मान्यवरांनी व्यक्त केला आहे. तेरणा शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर दिग्दर्शक आनंद पिल्लई, मुख्याध्यापिका शिजा एल्बर्ट, संतोषकुमार खांडगे, गणेश महाकाळ, निवृत्ती मोरे, स्रेहल परदेशी उपस्थित होत्या.शाळेत वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रथमच तेरणा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.- डॉ. राजीव सिंग, तेरणाराज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १८ जानेवारीपर्यंत स्पर्धा होणार असून यामधील विजेत्या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.- राकेश तळगावकर,समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई