शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खारघरहून थेट गाठा कल्याण-डोंबिवली, तळोजा नदीवरील पुलास मंजुरी

By नारायण जाधव | Updated: January 19, 2023 20:22 IST

या पुलामुळे तळोजासह डोंबिवली आणि अंबरनाथ या तीन एमआयडीसी जोडल्या जाणार आहेत.

नवी मुंबई :नवी मुंबईच्या बेलापूरसह खारघर-कामोठेहून कल्याण-डोंबविलीसह अंबरनाथ बदलापूरला जाण्यासाठी लवकरच शाॅर्टकट रस्ता होणार आहे. हा प्रवास सुखकर करण्यासाठी सिडको तळोजा नदीवर पूल बांधणार असून त्यास सीआरझेड प्राधिकरणाने परवानगी देऊन हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी परिवेश समितीकडे पाठविला आहे. यामुळे या पुलाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

सध्या कल्याण-डोंबविलीसह अंबरनाथ बदलापूरला जाण्यासाठी महापे मार्गे किंवा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कळंबोली जंक्शन, शीळफाटा जंक्शनसह एमआयडीसीतील वाहतूककोंडी छेदून जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात पैसा, वेळ, इंधन वाया जाते. शिवाय आवाजासह वायूप्रदूषणासही सामोरे जावे लागते. यामुळे सिडकोने आपल्या विकास आराखड्यात सायन-पनवेल महामार्गाने खारघरहून पेंधर-पाचनंद -तळोजा असा पूल प्रस्तावित केला आहे. तो पाचनंद येथे साडेबारा टक्के अंतर्गत वितरीत केलेल्या वसाहतीसह तळोजा एमआयडीसीला जोडून पुढे थेट कल्याण-डोंबविलीसह अंबरनाथ बदलापूरला जाणाऱ्या रस्त्यास जोडला जाणार आहे.

७०,१८४ चौरस मीटर वनजमीन जाणारया पुलासाठी ७०,१८४ चौरस मीटर वन जमीन जाणार आहे. यात ४,९३२ चौरस मीटर क्षेत्र सीआरझेडमध्ये मोडत नसून उर्वरित क्षेत्र सीआरझेडमध्ये येते. त्यामुळे हा प्रस्ताव सीआरझेडकडे सिडकोने पाठविला होता. त्यावर चर्चा करून मंजुरी देताना पुढील कार्यवाही तो स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲथोरिटी अर्थात परिवेश समितीकडे पाठविला आहे. यासाठी ०.०७४५ हेक्टर क्षेत्रावरील खारफुटी बाधित होणार असल्याने पर्यायी लागवडीसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील तुर्भे येथे जमीन दिली आहे. त्यासाठीचा लागवड खर्च सिडको मॅंग्रोव्ह सेलकडे जमा करणार आहे.

२० पिलरचा असणार पूलतळोजा नदीवरील प्रस्तावित पूल २० पिलरचा असेल. यातील दोन पूल प्रत्यक्षात नदीत टाकावे लागणार आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होणार नाही, स्थानिक मच्छीमारांसह स्थलांतरीत आणि स्थानिक पक्ष्यांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासह बांधकाम करताना परिसरात लेबर कॅम्प टाकण्यास मनाई केली आहे.

तीन एमआयडीसी जोडल्या जाणारया पुलामुळे तळोजासह डोंबिवली आणि अंबरनाथ या तीन एमआयडीसी जोडल्या जाणार आहेत. त्याचा फायदा याठिकाणी कच्च्या मालाची आणि तयार मालाची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांना होणार आहे. या तिन्ही एमआयडीसी नवी मुंबईसह पुणे व गोवा हायवे आणि जेएनपीए बंदर आणि नियोजित नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळास जोडल्या जातील.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई