शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रकल्पाची माहिती देण्यास टाळाटाळ, सिडकोकडे केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 00:44 IST

खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत.

कळंबोली : खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पाला रहिवासी, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. सिडकोने परस्पर गृहप्रकल्पाचा निर्णय घेतल्याने याबाबत माहिती मागितली असता, सिडकोकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी सांगितले.खांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक ११ हा सिडकोच्या शहर नियोजनानुसार बस टर्मिनल्ससाठी राखीव होता. मात्र, या ठिकाणी बस टर्मिनल्स तयार करण्यात आले नाही. आता पंतप्रधान आवास योजनेसाठी सिडकोने खाली बस टर्मिनल्स व वरती घर बांधण्याचे नियोजन केले आहे.काही दिवसांपूर्वी सिडकोने मोठी मोहीम राबवून भूखंडावरील मच्छीमार्केट, इतर दुकाने हटवली. आता भूखंडाला चहुबाजूंनी पत्रे लावून ठेकेदाराने जागा काबीज केली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात खंड पडल्याने वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने नाराजी व्यक्त झाली.बसटर्मिनल आणि टॉवर उभारण्यात येणार असल्याने विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. नियोजनानुसार बांधकाम केले नाही तर सर्वसामान्य नागरिकांवर सिडकोकडून कारवाई करण्यात येते. त्यांना सीसी आणि ओसी दिली जात नव्हती. मग शहर नियोजनानुसार या ठिकाणी बस टर्मिनल्स असताना वरती घरे कशी काय बांधली जात आहेत, असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी उपस्थित केला आहे.खांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील भूखंडावर होणारा प्रकल्प, आरक्षण या विषयी माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी, सिडकोच्या नियोजन विभागाकडे माहिती मागितली आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०१९ रोजी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्याप सिडकोकडून माहिती देण्यात आलेली नाही. अखेर त्यांनी ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळत नसल्याने पुन्हा अपील केले आहे.>गृहप्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनखांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. नागरी हक्क समितीबरोबर शिवसेनेने हा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रे काढून वाट मोकळी करून दिली होती. बुधवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन कामोठे येथील रहिवाशांच्या भावना कळवल्या. याबाबत ते काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे ध्यान लागून राहिले आहे.