शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

एपीएमसीने पुरविले ६ लाख टन अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 23:59 IST

तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबई, नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत ठेवण्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च ते आॅगस्ट पाच महिन्यांत ७३,५४० वाहनांमधून कृषिमाल मार्केटमध्ये आला आहे. तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये झाला. २१ मार्चला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर या परिसरातील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले, परंतु या परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करता यावा, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर व्यापारी व कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मार्केट बंद करण्याची मागणी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये बाजारसमितीमुळे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त पसरू लागल्यानंतर, शहरवासीयांमध्येही असंतोष निर्माण होऊन मार्र्केट बंद ठेवण्यासाठी दबाव वाढू लागला. दहा दिवस मार्केट बंदही ठेवावे लागले, परंतु मार्केट बंद ठेवल्यास धान्यपुरवठा करणारी दुसरी यंत्रणा नसल्यामुळे शहरवासीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली व पुन्हा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बाजारसमिती प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून मार्केटमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मास स्क्रीनिंग मोहिमेपासून अँटिजेन चाचणीपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सॅनिटायझरपासून आॅक्सिजन लेव्हल तपासणे व निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. व्यापारी संघटना, माथाडी कामगार नेते या सर्वांना विश्वासात घेऊन सर्व मार्केट सुरू ठेवली. २१ मार्च ते ३१ जुलै अखेरपर्यंत पाच मार्केटमध्ये ७३,५४० वाहनांची नोंद झाली. या काळात ६ लाख ६९ हजार २२६ टन मालाची आवक होऊन, तो मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ९३ हजार ४४५ टन कांदा, बटाटा, १ लाख ४ हजार टन भाजीपाला, १,८५८ टन भाजीपाला, १ लाख १४ हजार टन सुखामेवा व मसाल्याचे पदार्थ, २ लाख ३४ हजार टन धान्य पुरविले आहे. सुरुवातीच्या काळात झालेली महागाईही नियंत्रणात आणण्यात यश मिळविले.।कृत्रिम भाववाढही नियंत्रणातसुरुवातीच्या काळात किरकोळ व्यापाऱ्यांनी दर वाढविले, परंतु बाजारसमितीने पुरेसा साठा असल्याचे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृत्रिम भाववाढही नियंत्रणात आली. बाजारसमिती सुरू झाली नसती, तर मुंबई व नवी मुंबईकरांना धान्यपुरवठा करणे सरकारसाठी अशक्य झाले असते.>महिनानिहाय एपीएमसीमधील आवक (टन)मार्केट २१ ते ३१ मार्च एप्रिल मे जून जुलैकांदा मार्केट ९,००० १८,४७९ ११,३०५ २२,४३९ ३२,२२१भाजीपाला ४,६७८ ४,६७८ २०,६१३ ३८,४५८ ३६,४०४फळ मार्केट ५,६२५ ३४,४२९ १९,०८७ १३,९२४ ३६,४५४मसाला मार्केट १,६०४ २७,६२४ २५,२३२ ३४,८४० ३८,११२>कोरोनाच्या काळात मुंबई व नवी मुंबईकरांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर होती. सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार व वाहतूकदारांना विश्वासात घेऊन आम्ही विविध उपाययोजना केल्या. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यश आले.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती