शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीने पुरविले ६ लाख टन अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 23:59 IST

तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबई, नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत ठेवण्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च ते आॅगस्ट पाच महिन्यांत ७३,५४० वाहनांमधून कृषिमाल मार्केटमध्ये आला आहे. तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये झाला. २१ मार्चला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर या परिसरातील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले, परंतु या परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करता यावा, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर व्यापारी व कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मार्केट बंद करण्याची मागणी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये बाजारसमितीमुळे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त पसरू लागल्यानंतर, शहरवासीयांमध्येही असंतोष निर्माण होऊन मार्र्केट बंद ठेवण्यासाठी दबाव वाढू लागला. दहा दिवस मार्केट बंदही ठेवावे लागले, परंतु मार्केट बंद ठेवल्यास धान्यपुरवठा करणारी दुसरी यंत्रणा नसल्यामुळे शहरवासीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली व पुन्हा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बाजारसमिती प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून मार्केटमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मास स्क्रीनिंग मोहिमेपासून अँटिजेन चाचणीपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सॅनिटायझरपासून आॅक्सिजन लेव्हल तपासणे व निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. व्यापारी संघटना, माथाडी कामगार नेते या सर्वांना विश्वासात घेऊन सर्व मार्केट सुरू ठेवली. २१ मार्च ते ३१ जुलै अखेरपर्यंत पाच मार्केटमध्ये ७३,५४० वाहनांची नोंद झाली. या काळात ६ लाख ६९ हजार २२६ टन मालाची आवक होऊन, तो मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ९३ हजार ४४५ टन कांदा, बटाटा, १ लाख ४ हजार टन भाजीपाला, १,८५८ टन भाजीपाला, १ लाख १४ हजार टन सुखामेवा व मसाल्याचे पदार्थ, २ लाख ३४ हजार टन धान्य पुरविले आहे. सुरुवातीच्या काळात झालेली महागाईही नियंत्रणात आणण्यात यश मिळविले.।कृत्रिम भाववाढही नियंत्रणातसुरुवातीच्या काळात किरकोळ व्यापाऱ्यांनी दर वाढविले, परंतु बाजारसमितीने पुरेसा साठा असल्याचे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृत्रिम भाववाढही नियंत्रणात आली. बाजारसमिती सुरू झाली नसती, तर मुंबई व नवी मुंबईकरांना धान्यपुरवठा करणे सरकारसाठी अशक्य झाले असते.>महिनानिहाय एपीएमसीमधील आवक (टन)मार्केट २१ ते ३१ मार्च एप्रिल मे जून जुलैकांदा मार्केट ९,००० १८,४७९ ११,३०५ २२,४३९ ३२,२२१भाजीपाला ४,६७८ ४,६७८ २०,६१३ ३८,४५८ ३६,४०४फळ मार्केट ५,६२५ ३४,४२९ १९,०८७ १३,९२४ ३६,४५४मसाला मार्केट १,६०४ २७,६२४ २५,२३२ ३४,८४० ३८,११२>कोरोनाच्या काळात मुंबई व नवी मुंबईकरांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर होती. सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार व वाहतूकदारांना विश्वासात घेऊन आम्ही विविध उपाययोजना केल्या. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यश आले.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती