शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीने पुरविले ६ लाख टन अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 23:59 IST

तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबई, नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत ठेवण्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च ते आॅगस्ट पाच महिन्यांत ७३,५४० वाहनांमधून कृषिमाल मार्केटमध्ये आला आहे. तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये झाला. २१ मार्चला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर या परिसरातील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले, परंतु या परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करता यावा, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर व्यापारी व कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मार्केट बंद करण्याची मागणी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये बाजारसमितीमुळे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त पसरू लागल्यानंतर, शहरवासीयांमध्येही असंतोष निर्माण होऊन मार्र्केट बंद ठेवण्यासाठी दबाव वाढू लागला. दहा दिवस मार्केट बंदही ठेवावे लागले, परंतु मार्केट बंद ठेवल्यास धान्यपुरवठा करणारी दुसरी यंत्रणा नसल्यामुळे शहरवासीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली व पुन्हा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बाजारसमिती प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून मार्केटमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मास स्क्रीनिंग मोहिमेपासून अँटिजेन चाचणीपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सॅनिटायझरपासून आॅक्सिजन लेव्हल तपासणे व निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. व्यापारी संघटना, माथाडी कामगार नेते या सर्वांना विश्वासात घेऊन सर्व मार्केट सुरू ठेवली. २१ मार्च ते ३१ जुलै अखेरपर्यंत पाच मार्केटमध्ये ७३,५४० वाहनांची नोंद झाली. या काळात ६ लाख ६९ हजार २२६ टन मालाची आवक होऊन, तो मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ९३ हजार ४४५ टन कांदा, बटाटा, १ लाख ४ हजार टन भाजीपाला, १,८५८ टन भाजीपाला, १ लाख १४ हजार टन सुखामेवा व मसाल्याचे पदार्थ, २ लाख ३४ हजार टन धान्य पुरविले आहे. सुरुवातीच्या काळात झालेली महागाईही नियंत्रणात आणण्यात यश मिळविले.।कृत्रिम भाववाढही नियंत्रणातसुरुवातीच्या काळात किरकोळ व्यापाऱ्यांनी दर वाढविले, परंतु बाजारसमितीने पुरेसा साठा असल्याचे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृत्रिम भाववाढही नियंत्रणात आली. बाजारसमिती सुरू झाली नसती, तर मुंबई व नवी मुंबईकरांना धान्यपुरवठा करणे सरकारसाठी अशक्य झाले असते.>महिनानिहाय एपीएमसीमधील आवक (टन)मार्केट २१ ते ३१ मार्च एप्रिल मे जून जुलैकांदा मार्केट ९,००० १८,४७९ ११,३०५ २२,४३९ ३२,२२१भाजीपाला ४,६७८ ४,६७८ २०,६१३ ३८,४५८ ३६,४०४फळ मार्केट ५,६२५ ३४,४२९ १९,०८७ १३,९२४ ३६,४५४मसाला मार्केट १,६०४ २७,६२४ २५,२३२ ३४,८४० ३८,११२>कोरोनाच्या काळात मुंबई व नवी मुंबईकरांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर होती. सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार व वाहतूकदारांना विश्वासात घेऊन आम्ही विविध उपाययोजना केल्या. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यश आले.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती