शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

एपीएमसीत स्वच्छता अभियान

By admin | Updated: May 2, 2017 03:31 IST

राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई एपीएमसीमध्ये २ ते ८ मे दरम्यान विशेष स्वच्छता

नवी मुंबई : राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई एपीएमसीमध्ये २ ते ८ मे दरम्यान विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. सर्वात स्वच्छ बाजार समिती बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानामध्ये व्यापारी व सर्व घटक यामध्ये सहभागी होणार आहेत. बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी एपीएमसीमधील कामकाज सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कृषी मालाचा व्यापार असल्याने सर्व मार्केट स्वच्छ असले पाहिजेत यावर भर दिला आहे. स्वच्छता असेल, तर नागरिकांना चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध करून देता येणार आहे. यामुळेच २ मेपासून पाचही मार्केटसह विस्तारित मार्केटमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये अडते, व्यापारी, हमाल, मापाडी, माथाडी, वाहतूकदार व इतर सर्व घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. मार्केट आवारामधील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, विंगनिहाय चढ-उतार करणारे पायथे यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक विंगमधील कॉमन पॅसेज पाण्याने स्वच्छ करण्यात येणार आहेत. बाजार आवारातील सार्वजनिक प्रसाधनगृहांची साफसफाई व सर्वत्र धुरीकरणासह औषध फवारणीही केली जाणार आहे. दुर्गंधीनाशक कार्बोलिक पावडरचा शिडकावही करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानामध्ये मार्केटमधील ६ ठेकेदारांकडील २७५ कर्मचारी, महापालिकेचे ३५० कर्मचारी, विविध बाजार आवारामधील व्यापारी व इतर सर्व घटक मिळून सफाई करणार आहेत. याशिवाय ३ जेसीबी, ५ कॉम्पॅक्टर्स, २५ वॉटर टँकर्स, दोन जेट स्प्रे मशिनचा उपयोग होणार आहे. सात दिवसांमध्ये ४५० मेट्रिक टन कचरा निघेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच अभियान राबविले जात आहे. प्रशासक सतीश सोनी, सचिव शिवाजी पहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश देशपांडे, बजरंग जाधव, सतीश कटकधोंड, किरण घोलप, सय्यद झुल्फेकार, शिवाजी खापरे स्वत: अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.