शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

एपीएमसीत स्वच्छता अभियान

By admin | Updated: May 2, 2017 03:31 IST

राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई एपीएमसीमध्ये २ ते ८ मे दरम्यान विशेष स्वच्छता

नवी मुंबई : राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई एपीएमसीमध्ये २ ते ८ मे दरम्यान विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. सर्वात स्वच्छ बाजार समिती बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानामध्ये व्यापारी व सर्व घटक यामध्ये सहभागी होणार आहेत. बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी एपीएमसीमधील कामकाज सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कृषी मालाचा व्यापार असल्याने सर्व मार्केट स्वच्छ असले पाहिजेत यावर भर दिला आहे. स्वच्छता असेल, तर नागरिकांना चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध करून देता येणार आहे. यामुळेच २ मेपासून पाचही मार्केटसह विस्तारित मार्केटमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये अडते, व्यापारी, हमाल, मापाडी, माथाडी, वाहतूकदार व इतर सर्व घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. मार्केट आवारामधील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, विंगनिहाय चढ-उतार करणारे पायथे यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक विंगमधील कॉमन पॅसेज पाण्याने स्वच्छ करण्यात येणार आहेत. बाजार आवारातील सार्वजनिक प्रसाधनगृहांची साफसफाई व सर्वत्र धुरीकरणासह औषध फवारणीही केली जाणार आहे. दुर्गंधीनाशक कार्बोलिक पावडरचा शिडकावही करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानामध्ये मार्केटमधील ६ ठेकेदारांकडील २७५ कर्मचारी, महापालिकेचे ३५० कर्मचारी, विविध बाजार आवारामधील व्यापारी व इतर सर्व घटक मिळून सफाई करणार आहेत. याशिवाय ३ जेसीबी, ५ कॉम्पॅक्टर्स, २५ वॉटर टँकर्स, दोन जेट स्प्रे मशिनचा उपयोग होणार आहे. सात दिवसांमध्ये ४५० मेट्रिक टन कचरा निघेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच अभियान राबविले जात आहे. प्रशासक सतीश सोनी, सचिव शिवाजी पहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश देशपांडे, बजरंग जाधव, सतीश कटकधोंड, किरण घोलप, सय्यद झुल्फेकार, शिवाजी खापरे स्वत: अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.