शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

एपीएमसीत खासगी वाहनांचे अनधिकृत पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 04:49 IST

खासगी वाहनांवर नियंत्रण नाही : मार्केटमध्ये रिक्षा उभ्या करण्याचे प्रमाणही वाढले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. मालवाहतुकीबरोबर खासगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. १०० पेक्षा जास्त रिक्षाही उभ्या केल्या जात असून, बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे. मार्केटमधील कामकाजाला शिस्त लावण्यात अपयश येऊ लागले आहे. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसून राहत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मार्केटमधील समस्या निदर्शनास येत नाहीत. अनेक दिवसांपासून पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. कांदा मार्केटमध्ये रोज ५० ते ७० रिक्षा अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत. रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी दिली कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असून लिलावगृहामध्येही मोटारसायकल उभ्या केल्या जात आहेत. माल खाली केल्यानंतरही अवजड वाहने मार्केटमध्येच उभी करण्यात येत आहेत. फळ मार्केटमधील स्थिती सर्वात गंभीर झाली आहे. या ठिकाणी खासगी वाहने व मोटारसायकल उभ्या केल्या जाऊ नये, असे फलक लावलेल्या ठिकाणीही वाहने उभी करण्यात येत आहेत. रात्रीही २०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत. भाजी मार्केटमध्येही अनधिकृत पार्किंग वाढत आहे.मसाला व धान्य मार्केटमध्ये खासगी वाहने उभी करण्यासाठीचे योग्य नियोजन नाही. पार्किंगचे धोरणच नसल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.समन्वय नाहीएपीएमसीमधील पार्किंगच्या समस्येविषयी काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्यापारी-वाहतूकदार व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. व्यापारी व वाहतूकदारांच्या दबावामुळे अवैध पार्किंगवर ठोस कारवाई करता येत नसल्याचे बोलले जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व घटकांशी समन्वय साधून धोरण निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई