शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

एपीएमसीचे मार्केट झाले चकाचक

By admin | Updated: January 29, 2017 02:28 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाचही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाचही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आला आहे. विशेषत: भाजी व फळ मार्केटच्या गाळ्यांवर कामगारांसाठी उभारलेल्या झोपड्याही हटविण्यात आल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छतेमध्येही देशात सर्वोत्कृष्ट ठरावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासक मनोज सौनिक, सचिव शिवाजी पहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार, कार्यकारी अभियंता आर. आर. खिस्ते, एस. एम. मोहाडे, स्वच्छता अधिकारी एस. एन. कटकधोंड यांनी सलग १५ दिवस विशेष मोहीम राबविली आहे. फळ व भाजी मार्केटच्या गाळ्यांवर बांबू व प्लास्टीकचा वापर करून झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. भाजी, फळ ठेवण्याचे प्लास्टीकचे क्रेट्स व इतर साहित्य ठेवले होते. अनेक ठिकाणी सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. हे सर्व अतिक्रमण हटविण्यात आले आहे. २० वर्षांमध्ये प्रथमच गाळ्यांवरील झोपड्या हटविल्या गेल्याने मार्केट स्वच्छ दिसू लागले आहे. मार्केटमध्ये नियमित कचरा उचलला जातो, पण यानंतरही अनेक ठिकाणी डेब्रिजचे ढीग व इतर साहित्य पडलेले असते. हा सर्व कचराही हटविण्यात आला आहे. मसाला, धान्य मार्केटमधील डेब्रिजही हलविण्यात आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. पण मार्केटमध्ये स्वच्छता ठेवली जात नव्हती. प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली होती. प्रशासनाने स्वच्छतेवर विशेष लक्ष दिल्याने आता पाचही मार्केट कचरामुक्त होवू लागली आहेत.बाजार समितीचे मुख्य प्रशासक, सचिव व अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे. मार्केट कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न असून अशाच प्रकारचे साफसफाई नियमितपणे ठेवली जाणार आहे. - आर. आर. खिस्ते, कार्यकारी अभियंता, एपीएमसी