शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

रेशनकार्डवरील मोफत धान्याची घोषणा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:12 IST

कष्टकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण ; घोषणेला झाले १५ दिवस

नवी मुंबई : मिशन ब्रेक दि चेनअंतर्गत राज्य सरकारने १ मेपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. या कालावधीत सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये, यादृष्टीने काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, विविध कारणांमुळे ही योजना केवळ कागदावरच सीमित राहिल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात १६ एप्रिल रोजी अधिकृत आदेश जारी केले होते. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या होत्या. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी नवी मुंबईतील काही मोजक्याच शिधावाटप दुकानात या योजनेअंतर्गत धान्य वाटप सुरू असल्याचे दिसून आले आहे. परंतु, बहुतांश दुकानांत ही योजना सुरू नसल्याने गरजूंची परवड होताना दिसत आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने लागू केलेल्या कडक निबंर्धांच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्यांना मदत म्हणून प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. परंतु, पंधरा दिवस उलटले तरी याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई