शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

फेरीवाल्यांवरील कारवाईत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:02 IST

नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देमार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांना अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहराची परिस्थिती गंभीर होत असतानाही प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.शहरात अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाले यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भूमाफियांकडून नागरी सुविधांचे भूखंड लाटले जात असून, फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ गिळंकृत केले आहेत. यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी पदपथ राहिले नसून, ठिकठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात हे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यासंदर्भात अनेकांनी सातत्याने तक्रारी करूनदेखील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बर्‍या प्रमाणात शहराला फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व पदपथ व्यापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बहुतांश अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरचे असून त्यांना प्रशासनातीलच काही अधिकार्‍यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे. यामुळेच निश्‍चित ठिकाणी कारवाईपूर्वी फेरीवाले दिसेनासे होवून व पथक जाताच पुन्हा धंदा मांडतात. या संपूर्ण चक्रामागे अर्थपूर्ण हितसंबंध असून त्यात प्रशासनातील अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.नागरिकांची तक्रार आल्यास त्याठिकाणी पालिकेचे वाहन कारवाईच्या उद्देशाने येते. मार्जिनल स्पेसवरील वडापाव, फेरीवाले वगळता फक्त फेरीवाल्यांना हटवले जाते असल्याचे गुरुवारी प्रत्यक्ष निदर्शनास आले. मात्र, मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना आश्रय देण्यामागच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेचा उलगडा होऊ शकलेला नाही, तर काही नागरिकांनी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस सहकार्य करत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. 

टॅग्स :Mumbaiमुंबई