शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

फेरीवाल्यांवरील कारवाईत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:02 IST

नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देमार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांना अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहराची परिस्थिती गंभीर होत असतानाही प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.शहरात अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाले यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भूमाफियांकडून नागरी सुविधांचे भूखंड लाटले जात असून, फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ गिळंकृत केले आहेत. यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी पदपथ राहिले नसून, ठिकठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात हे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यासंदर्भात अनेकांनी सातत्याने तक्रारी करूनदेखील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बर्‍या प्रमाणात शहराला फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व पदपथ व्यापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बहुतांश अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरचे असून त्यांना प्रशासनातीलच काही अधिकार्‍यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे. यामुळेच निश्‍चित ठिकाणी कारवाईपूर्वी फेरीवाले दिसेनासे होवून व पथक जाताच पुन्हा धंदा मांडतात. या संपूर्ण चक्रामागे अर्थपूर्ण हितसंबंध असून त्यात प्रशासनातील अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.नागरिकांची तक्रार आल्यास त्याठिकाणी पालिकेचे वाहन कारवाईच्या उद्देशाने येते. मार्जिनल स्पेसवरील वडापाव, फेरीवाले वगळता फक्त फेरीवाल्यांना हटवले जाते असल्याचे गुरुवारी प्रत्यक्ष निदर्शनास आले. मात्र, मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना आश्रय देण्यामागच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेचा उलगडा होऊ शकलेला नाही, तर काही नागरिकांनी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस सहकार्य करत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. 

टॅग्स :Mumbaiमुंबई