शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवरील कारवाईत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:02 IST

नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देमार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांना अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहराची परिस्थिती गंभीर होत असतानाही प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ ठरावीक फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावा करत मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना मात्र सूट दिली जात आहे. तर अधिकार्‍यांऐवजी सुरक्षारक्षकांनाच कारवाईसाठी पाठवले जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत साशंकता निर्माण होत आहे.शहरात अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाले यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भूमाफियांकडून नागरी सुविधांचे भूखंड लाटले जात असून, फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ गिळंकृत केले आहेत. यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी पदपथ राहिले नसून, ठिकठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात हे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यासंदर्भात अनेकांनी सातत्याने तक्रारी करूनदेखील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बर्‍या प्रमाणात शहराला फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व पदपथ व्यापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बहुतांश अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरचे असून त्यांना प्रशासनातीलच काही अधिकार्‍यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे. यामुळेच निश्‍चित ठिकाणी कारवाईपूर्वी फेरीवाले दिसेनासे होवून व पथक जाताच पुन्हा धंदा मांडतात. या संपूर्ण चक्रामागे अर्थपूर्ण हितसंबंध असून त्यात प्रशासनातील अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.नागरिकांची तक्रार आल्यास त्याठिकाणी पालिकेचे वाहन कारवाईच्या उद्देशाने येते. मार्जिनल स्पेसवरील वडापाव, फेरीवाले वगळता फक्त फेरीवाल्यांना हटवले जाते असल्याचे गुरुवारी प्रत्यक्ष निदर्शनास आले. मात्र, मार्जिनल स्पेसवरील फेरीवाल्यांना आश्रय देण्यामागच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेचा उलगडा होऊ शकलेला नाही, तर काही नागरिकांनी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस सहकार्य करत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. 

टॅग्स :Mumbaiमुंबई