शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्यभरातील पोलिसांच्या प्रतिमेचे होणार मूल्यमापन; नवी मुंबई, सातारा येथून हाेणार सुरुवात

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 24, 2023 06:59 IST

येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार असून त्याची सुरुवात नवी मुंबई व सातारा येथून केली जाणार आहे.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : राज्यभरातील पोलिसांच्या कामगिरीवरून जनतेला किती सुरक्षित वाटते याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी संस्थेमार्फत जनसामान्यांमधून काही प्रश्नावलीतून सुरक्षाधारणा निर्देशांक काढला जाणार आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार असून त्याची सुरुवात नवी मुंबई व सातारा येथून केली जाणार आहे.

सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिस आणि नागरिक यांच्यात सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. मात्र, अनेकदा काही कारणांनी समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन होत असते. त्याचे पडसाद नागरिकांच्या रोषातून उमटत असतात. त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी पोलिसांकडूनदेखील विविध उपक्रम राबविले जातात. पोलिसांवर दैनंदिन कामकाजासह घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, फरार गुन्हेगारांचा शोध, प्रतिबंधात्मक कारवाया, नियोजित बंदोबस्त, आंदोलने यांचीही जबाबदारी असते. त्या माध्यमातून पोलिसांचा नागरिकांसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध येत असतो.

यादरम्यान पोलिसांच्या कृती आणि वर्तनातून नागरिकांमध्ये चांगली किंवा वाईट प्रतिमा तयार होत असते. त्यावरून नागरिकांना किती सुरक्षित वाटते याचेही अनुमान बांधले जातात. याच्या तपासणीसाठी पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील पोलिस घटकांसाठी पथदर्शी स्वरूपात इंडेक्स ऑफ सेफ्टी परसेप्शन तयार करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई पोलिस आयुक्तालय व सातारा पोलिस अधीक्षक क्षेत्रातून केली जाणार आहे. 

संस्थेमार्फत हे काम केले जाणार असून त्यासाठी प्रश्नावली तयार केली जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दलची काय भावना आहे हे तपासून त्यांना शहरात सुरक्षित वाटत आहे का हे तपासले जाणार आहे. त्यामुळे या चाचणीतून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक समोर येण्याची शक्यता आहे.

प्रतिमा उजळविण्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न  मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे हे कर्मचाऱ्यांकडून शिस्तीचे धडे गिरवून घेत आहेत.   त्यातच नवी मुंबईत हा पथदर्शी उपक्रम राबविला जाणार असल्याने पोलिसांना त्यांची प्रतिमा उजळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिस