शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

रुग्णवाहिका नावापुरत्याच!

By admin | Updated: August 6, 2015 23:45 IST

मोफत अंत्यसंस्कार करणारी नवी मुंबई महानगरपालिका अपघातग्रस्त व इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ करत आहे. पालिकेची

नामदेव मोरे ,  नवी मुंबई मोफत अंत्यसंस्कार करणारी नवी मुंबई महानगरपालिका अपघातग्रस्त व इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ करत आहे. पालिकेची सुविधा नसल्याने नाइलाजाने खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेची अत्याधुनिक फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच ‘फॅक’ वाहनेही एक वर्षापासून धूळखात पडून आहेत. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये असंतोष आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोफत अंत्यविधी करणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे, मात्र व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. नवी मुंबईमध्ये सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड, पामबीच रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातग्रस्तांना महापालिकेची रुग्णवाहिका मिळत नाही. पालिकेत फोन केल्यास, ‘आम्ही रुग्णवाहिका देत नाही. आमच्या रुग्णालयातून रुग्ण इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच त्याचा वापर केला जातो,’ असे सांगितले जाते. महापालिकेच्या २० रुग्णवाहिका आहेत. यामधील ७ रुग्णवाहिका भंगारात गेल्या आहेत. उर्वरित १३पैकी ५ वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय व ५ माताबाल रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. एका रुग्णवाहिकेमध्ये फिरता दवाखाना असून २ रुग्णवाहिका बिघडल्या आहेत. पालिका रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका उभ्या असल्या तरी विविध कारणांनी सेवा नाकारली जाते. त्यामुळे नाइलाजाने खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नवी मुंबई नगरपालिकेने अपघात झाल्यानंतर रुग्णांना तत्काळ उपचार देण्यासाठी गतवर्षी दोन अत्याधुनिक फॅक व्हॅन खरेदी केल्या.लोकप्रतिनिधींचा आधार : शहरात नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. विजय माने, सोमनाथ वास्कर, दिलीप आमले व इतर अनेक जण तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देतात. शुक्रवारी एका अपघातानंतर मध्यरात्री २ वाजता रुग्णास डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयामधून वाशीतील एमजीएम रुग्णालयात तत्काळ हलविणे आवश्यक होते. तेव्हा नेरूळचे नगरसेवक सूरज पाटील यांनी रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शवून रुग्णाचा जीव वाचविला. अशा लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता खासगी रुग्णवाहिका गरज पाहून नागरिकांकडून जादा पैसेच उकळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सरकारच्या रुग्णवाहिकेचीही दिरंगाईकेंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. १०८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहिका कुठेही बोलविता येते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरच सरकारची रुग्णवाहिका २४ तास उभी असते. परंतु दोन दिवसांपूर्वी पदपथावर महिलेची प्रसूती झाल्यानंतर या रुग्णवाहिकेसाठी चालकच नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही सुविधाही वेळेत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.