शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

By नामदेव मोरे | Updated: November 10, 2023 16:58 IST

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना २०५० पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महानगरपालिकेने तज्ञ समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून पातळगंगासह कुंडलीकामधील पाणीनवी मुंबईसाठी मिळविता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याविषयी अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापन केलेल्या समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शहरवासीयांना होणारा पाणी पुरवठा व भविष्यातील गरज यावर चर्चा करण्यात आली. भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून कुूंडलीका नदीत सोडण्यात येणारे पाणी शहरांतील नागरिकांसाठी वापरात आणण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्त प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर चर्चा करण्यात आली. पातळगंगा नदीमध्ये टाटा पॉवरच्यावतीने वीजनिर्मीती केल्यानंतर सोडून देण्यात येणाऱ्या पाण्यामधून १०० दशलक्ष पाणी खोपोली येथून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविण्याविषयी पर्यायाचाही विचार करण्यात आला. पातळगंगा नदीतील उपलब्ध पाण्यासाठी इतर संस्थांनी आरक्षण केले नसेल तर मनपाच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कुंडलिका नदीवरून पर्यायी शाश्वत स्त्रोताबाबत प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या बैठकीला आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मनोज पाटील, व्हीजेटीआय मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉ. पी पी भावे , आयआयटीचे ज्योती प्रकाश, मिलींद केळकर, माजी शहर अभियंता मोहन डगावकर, अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, सु श वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचा अनाठायी वापर होऊ नये

नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेमध्ये प्रतीमाणसी अधिक पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्याचा अनाठायी वापर होण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. भविष्यात ठाणे जिल्ह्यातील १४ गावे महानगरपालिकेत सहभागी झाल्यास त्यांना कराव्या लागणाऱ्या पाणी पुरवठ्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी