शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

By नामदेव मोरे | Updated: November 10, 2023 16:58 IST

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना २०५० पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महानगरपालिकेने तज्ञ समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून पातळगंगासह कुंडलीकामधील पाणीनवी मुंबईसाठी मिळविता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याविषयी अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापन केलेल्या समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शहरवासीयांना होणारा पाणी पुरवठा व भविष्यातील गरज यावर चर्चा करण्यात आली. भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून कुूंडलीका नदीत सोडण्यात येणारे पाणी शहरांतील नागरिकांसाठी वापरात आणण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्त प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर चर्चा करण्यात आली. पातळगंगा नदीमध्ये टाटा पॉवरच्यावतीने वीजनिर्मीती केल्यानंतर सोडून देण्यात येणाऱ्या पाण्यामधून १०० दशलक्ष पाणी खोपोली येथून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविण्याविषयी पर्यायाचाही विचार करण्यात आला. पातळगंगा नदीतील उपलब्ध पाण्यासाठी इतर संस्थांनी आरक्षण केले नसेल तर मनपाच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कुंडलिका नदीवरून पर्यायी शाश्वत स्त्रोताबाबत प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या बैठकीला आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मनोज पाटील, व्हीजेटीआय मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉ. पी पी भावे , आयआयटीचे ज्योती प्रकाश, मिलींद केळकर, माजी शहर अभियंता मोहन डगावकर, अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, सु श वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचा अनाठायी वापर होऊ नये

नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेमध्ये प्रतीमाणसी अधिक पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्याचा अनाठायी वापर होण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. भविष्यात ठाणे जिल्ह्यातील १४ गावे महानगरपालिकेत सहभागी झाल्यास त्यांना कराव्या लागणाऱ्या पाणी पुरवठ्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी