शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

By नामदेव मोरे | Updated: November 10, 2023 16:58 IST

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना २०५० पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महानगरपालिकेने तज्ञ समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून पातळगंगासह कुंडलीकामधील पाणीनवी मुंबईसाठी मिळविता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याविषयी अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापन केलेल्या समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शहरवासीयांना होणारा पाणी पुरवठा व भविष्यातील गरज यावर चर्चा करण्यात आली. भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून कुूंडलीका नदीत सोडण्यात येणारे पाणी शहरांतील नागरिकांसाठी वापरात आणण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्त प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर चर्चा करण्यात आली. पातळगंगा नदीमध्ये टाटा पॉवरच्यावतीने वीजनिर्मीती केल्यानंतर सोडून देण्यात येणाऱ्या पाण्यामधून १०० दशलक्ष पाणी खोपोली येथून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविण्याविषयी पर्यायाचाही विचार करण्यात आला. पातळगंगा नदीतील उपलब्ध पाण्यासाठी इतर संस्थांनी आरक्षण केले नसेल तर मनपाच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कुंडलिका नदीवरून पर्यायी शाश्वत स्त्रोताबाबत प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या बैठकीला आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मनोज पाटील, व्हीजेटीआय मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉ. पी पी भावे , आयआयटीचे ज्योती प्रकाश, मिलींद केळकर, माजी शहर अभियंता मोहन डगावकर, अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, सु श वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचा अनाठायी वापर होऊ नये

नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेमध्ये प्रतीमाणसी अधिक पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्याचा अनाठायी वापर होण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. भविष्यात ठाणे जिल्ह्यातील १४ गावे महानगरपालिकेत सहभागी झाल्यास त्यांना कराव्या लागणाऱ्या पाणी पुरवठ्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी