शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप

By admin | Updated: January 5, 2017 06:27 IST

पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उघडकीस आणून त्यामधील करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक सतीश माथूर

नवी मुंबई : पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उघडकीस आणून त्यामधील करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐवज संबंधितांकडे सोपवण्यात आला. त्याकरिता वाशीतील भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही वर्षांत सराईत गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करून नवी मुंबई पोलिसांनी कार्यक्षमता सिद्ध केली आहे. अशाच गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे चार कोटींचा ऐवज नुकताच पनवेल येथील कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी वाशीत झालेल्या कार्यक्रमात दोन कोटी ३४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल १५४ तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला. महाराष्ट्र पोलीस स्थापनादिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार मागील काही महिन्यांत उघड झालेल्या गुन्ह्यांमधील जप्त केलेला ऐवज संबंधितांच्या ताब्यात देण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी चोरीला गेलेला मुद्देमाल मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नसल्याचे माथूर यांनी उपस्थितांना सांगितले. गुन्ह्यामध्ये पकडलेल्या आरोपीला शिक्षा झाल्यानंतरच ही प्रक्रिया संपुष्टात येत असून त्यासाठी तक्रारदारांनी न्यायालयात हजर राहून साक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यथा, ऐन वेळी तक्रारदार न्यायालयात गैरहजर राहिल्याने गुन्हेगारांची शिक्षा टळल्याची अनेक प्रकरणे घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर पोलिसांनीही समाजाच्या समाधानासाठी आरोपीला कोठडी होईपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. नवी मुंबईची जडणघडण होत असताना, आपणही इथे काम केल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी पनवेल व गडचिरोली या ठिकाणी जाण्याला कोणी अधिकारी तयार नसताना आपण पनवेल निवडले. शहरात तेव्हाच्या व सध्याच्या परिस्थतीमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. मात्र, सध्या प्रत्येकजण नवी मुंबईतच बदली मागत असल्यामुळे, शहरात असे नेमके काय आहे? हे शोधावे लागणार असल्याचेही त्यांनी विनोदी शैलीतून सांगितले.या वेळी घडलेल्या गुन्ह्याची उकल करून तक्रारदारांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलिसांपुढे अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून गुन्हेगारांना अटक केल्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल संबंधितांकडे सोपवण्याचा हा दिवस पोलिसांकरिता आत्मसंतुष्टीचा दिवस असल्याची भावना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केली. गतकाळात सराईत गुन्हेगारांच्या ३ टोळ्यांमधील १७ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, फसवणुकीच्या ९९ तक्रारींमधील ३१ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१६ मध्ये ६० टक्के गुन्हे सिद्ध झाले असून तपासाचे हे प्रमाण सन २०१५च्या तुलनेत अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.गुन्हेगारांची माहिती आॅनलाइनसराईत गुन्हेगारांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यापासून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. याकरिता साडेचार हजार गुन्हेगारांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. तर यापुढे अधिकारी बदलला तरी तपासाच्या कामात अडथळा होणार नाही, अशी यंत्रणा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.