शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

युती, आघाडी होण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: January 8, 2015 22:40 IST

प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत.

वसई : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर युती व आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाल्यामुळे त्या निवडणुकांमध्ये सेना-भाजपा व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. कालांतराने सेना-भाजपाची युती झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या दोघांमध्ये जागांसंदर्भात समझोता होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप सुंदोपसुंदी सुरूच असल्यामुळे हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात एकमेकांसमोर उमेदवार उभे करतील, असा अंदाज आहे.पालघर जिल्ह्यातील ३ विधानसभा जागा जिंकून बहुजन विकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीमध्ये सातही तालुक्यांतील गट व गणांच्या जागा लढवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सरकार स्थापनेकरिता भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणारी बविआ जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भाजपाशी समझोता करील, अशी शक्यता नाही. स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी बविआच्या वरिष्ठ नेत्यांचे तेवढे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर समझोता होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाशी दुरावा निर्माण झाल्यामुळे बविआ पुन्हा काँगे्रसच्या वळचणीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डहाणूवगळता अन्य तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ नसल्यामुळे या निवडणुका लढवताना राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. सेनेने यापूर्वीही पालघर तालुक्यात या निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळविल्याने यंदाही ते पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पालघर येथे सेनेची लढत बहुजन विकास आघाडीशीच होण्याची शक्यता आहे. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर येथील काँगे्रस विस्कळीत झाली आहे. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रचंड वाद झाले. एकंदरीत या सर्व घडामोडीवरून काँग्रेस पक्ष एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाईल, अशी शक्यता वाटत नाही. वसई जनआंदोलन समितीचे नेते विवेक पंडित यांचा प्रचंड मतांनी पराभव झाल्यामुळे हा पक्ष अद्याप पराभूत मानसिकतेमधून बाहेर आलेला नाही. त्यामुळे त्यांनाही या निवडणुका लढवणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.