शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच

By नारायण जाधव | Updated: July 10, 2023 16:09 IST

या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.

नवी मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह सर्वच क्षेत्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे योगदान मोठे आहे. अशा कामगारांचे ३८ घटकांतील वर्गीकरण एकूण ३४० क्षेत्रांतील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह, प्रिंट आणि टीव्ही, डिजिटल क्षेत्रातील पत्रकार, तत्सम कर्मचारी, कॉल सेंटर, मॉल, लॉ फर्म, शिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.

केंद्र सरकारने असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या डिसेंबर २००८ मध्ये असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम मंजूर केला आहे. त्यानुसार लेबर ब्युरो, चंडीगड यांनी २०१४ मध्ये केलेल्या चौथ्या वार्षिक रोजगार-बेरोजगार सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात ३,६५,२५,१४० असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम २०१३ अन्वये ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ’ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल तयार केले असून त्यावर ३१ मे २०२३ अखेर राज्यात सुमारे १३६.२८ लाख असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. हे कामगार कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

मिळणार सरकारी योजनांचा लाभराज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कामगारांच्या कल्याणाकरिता कल्याण मंडळे स्थापन करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु, अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेक्षक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देता योग्य होईल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.

या ३९ क्षेत्रांतील कामगारांचा समावेशनव्या असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यक्षेत्रात कृषी, पशुपालन, डेअरी, घरकामगार, बिडी उद्योेग, रिक्षा-टॅक्सीचालक, हमाल, बूट पॉलिश, कपडा, पॉवरलूम, पत्रकारितेतील छापील, टीव्ही, डिजिटल माध्यम, हॉटेल उद्योग, बँकिंग क्षेत्र, ब्युटी पार्लर, सिनेमा उद्योग, बांधकाम उद्योग, शिक्षण संस्था, जाहिरात, मॉडेलिंग, लेखक, कवी, सर्व अन्नप्रक्रिया उद्योग, तेंदूपत्ता कामगार, आशा, अंगणवाडी वर्कर, काॅल सेंटर, मॉल, सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कामगार, दवाखाने, हॉस्पिटल, फार्मा उद्याेग, वकील, ज्योतिष, इंजिनीअर, प्रॉपर्टी डिलरसह इतर व्यावसायिक, थिएटर उद्योग, वाहतूक उद्योग, पर्यटन क्षेत्र आणि स्वयंरोजगार अशा ३४० क्षेत्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई