शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच

By नारायण जाधव | Updated: July 10, 2023 16:09 IST

या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.

नवी मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह सर्वच क्षेत्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे योगदान मोठे आहे. अशा कामगारांचे ३८ घटकांतील वर्गीकरण एकूण ३४० क्षेत्रांतील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह, प्रिंट आणि टीव्ही, डिजिटल क्षेत्रातील पत्रकार, तत्सम कर्मचारी, कॉल सेंटर, मॉल, लॉ फर्म, शिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.

केंद्र सरकारने असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या डिसेंबर २००८ मध्ये असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम मंजूर केला आहे. त्यानुसार लेबर ब्युरो, चंडीगड यांनी २०१४ मध्ये केलेल्या चौथ्या वार्षिक रोजगार-बेरोजगार सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात ३,६५,२५,१४० असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम २०१३ अन्वये ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ’ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल तयार केले असून त्यावर ३१ मे २०२३ अखेर राज्यात सुमारे १३६.२८ लाख असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. हे कामगार कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

मिळणार सरकारी योजनांचा लाभराज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कामगारांच्या कल्याणाकरिता कल्याण मंडळे स्थापन करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु, अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेक्षक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देता योग्य होईल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.

या ३९ क्षेत्रांतील कामगारांचा समावेशनव्या असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यक्षेत्रात कृषी, पशुपालन, डेअरी, घरकामगार, बिडी उद्योेग, रिक्षा-टॅक्सीचालक, हमाल, बूट पॉलिश, कपडा, पॉवरलूम, पत्रकारितेतील छापील, टीव्ही, डिजिटल माध्यम, हॉटेल उद्योग, बँकिंग क्षेत्र, ब्युटी पार्लर, सिनेमा उद्योग, बांधकाम उद्योग, शिक्षण संस्था, जाहिरात, मॉडेलिंग, लेखक, कवी, सर्व अन्नप्रक्रिया उद्योग, तेंदूपत्ता कामगार, आशा, अंगणवाडी वर्कर, काॅल सेंटर, मॉल, सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कामगार, दवाखाने, हॉस्पिटल, फार्मा उद्याेग, वकील, ज्योतिष, इंजिनीअर, प्रॉपर्टी डिलरसह इतर व्यावसायिक, थिएटर उद्योग, वाहतूक उद्योग, पर्यटन क्षेत्र आणि स्वयंरोजगार अशा ३४० क्षेत्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई