शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची माेर्चेबांधणी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क कार्यालय उद्घाटनांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 01:55 IST

कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पाच वर्षे बंद असलेली जनसंपर्क कार्यालये पुन्हा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वार्डमध्ये तीन ते चार नवीन कार्यालये सुरू होऊ लागली आहेत. हळदी-कुंकू समारंभ व सहलींचे प्रमाणही वाढले आहे.कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकांच्या हालचाली सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनीही माेर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे. नगरसेवक व इतर अनेक कार्यकर्त्यांची कार्यालये पाच वर्षे नेहमी सुरूच असतात. परंतु निवडणूक लढण्याची इच्छा असणारे अनेक कार्यकर्ते फक्त निवडणुका जवळ आल्या की कार्यालये सुरू करतात व निवडणुका संपल्या की पुन्हा बंद करीत असतात. यावेळीही नवीन कार्यालय सुरू करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. काही प्रभागांमध्ये पाच ते सहा इच्छुकांची कार्यालये उभी राहिली आहेत. जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनांसाठी पक्षाच्या नेत्यांची उपस्थितीही वाढू लागली असून, एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनांसोबतच हळदी-कुंकू समारंभांची संख्याही वाढली आहे. निवडणुकीसाठी महिलांची मते निर्णायक ठरत असतात. ही मते आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केली जात आहेत. मतदारांना देवदर्शन व पर्यटन स्थळांवर सहलीसाठी घेऊन जाण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हरलेल्या अनेकांनी कार्यालये बंद केली होती. त्यापैकी अनेकांनी पुन्हा कार्यालये सुरू केली आहेत. हंगामी कार्यालय सुरू करण्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पाच वर्षे नियमित कार्यालय सुरू ठेवणाऱ्यांनीही प्रचारामध्ये या मुद्याकडे मतदारांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.आघाडीचे नाईकांवर टीकास्त्रमहाविकास आघाडीच्या नेत्यांनीही नवी मुंबईमध्ये नवीन कार्यालयांची उद्घाटने व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व आ. शशिकांत शिंदे यांनी भाजप आ. गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाईक यांना सर्व काही दिले. आमदार, खासदार, मंत्री, महापौर सर्व पदे एकाच घरात दिली. फक्त मुंबईतील सिल्वर ओकचे घर व काटेवाडीची घर सोडून सर्व काही दिले, तर नाईकांनी धोका दिल्याची टीका आव्हाड यांनी सीवूडमध्ये केली.नाईकांचे विकासावर बोलण्याचे आव्हानभाजप आमदार गणेश नाईक यांनीही विरोधकांवर आक्रमकपणे टीका करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईच्या जनतेने आमच्यावर नेहमीच विश्वास दाखविला व आम्ही शहराचा विकास करून तो विश्वास सार्थ ठरविला. तुर्भे येथे झालेल्या कार्यक्रमात पक्ष सोडून गेलेल्यांवरही टीका केली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका