शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऐरोली-काटई प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:57 IST

उन्नत मार्ग ; खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते काटई हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांचा होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते पुढे म्हणाले.ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाच्या कामाचा आढावा गुरुवारी डॉ. शिंदे यांनी घेतला. या वेळी एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. उन्नत मार्गातील पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. नियोजित वेळेआधीच उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी शिंदे यांनी दिल्या.ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन या टप्प्यातील सहा मार्गिका व बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही कामे झाल्यानंतर प्रवास अत्यंत वेगवान होणार असून, इंधन व वेळेची बचत होणार आहे. शिवाय वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागणार नाही. या मार्गाचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकरांना होणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनसाठी नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता प्रस्ताव सादर केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्याची प्रक्रियाही लवकर सुरू करण्यात येणार आहे. बाधितांचे पुनर्वसन ठाणे मनपा व एमएमआरडीएतर्फे केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

असा असेल रस्ताn ऐरोली ते काटई नाका रस्ता हा १२.३ किमी लांबीचा आहे. कामाचे तीन टप्प्यांत विभाजन केले आहे. त्यात पहिला टप्पा ठाणे-बेलापूर, दुसरा ऐरोली पूल ते ठाणे आणि तिसरा काटई नाका असा आहे.n प्रकल्पाचा पहिला भाग हा अंशत: उन्नत व पारसिक डोंगरातून जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ३८२ कोटी आहे. बोगद्याची लांबी साडेतीन किलोमीटर आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सगळ्या बोगद्यांपेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा आहे. त्यात तीन अधिक एक मार्गिका राहणार आहेत.n बोगद्याच्या बांधकामादरम्यान प्रथमत: सात मीटर रुंद पायलट खोदकाम करण्यात येणार आहे. बोगद्यासाठी पंखे लावून व्हेंटिलेटशन तसेच विद्युतीकरणही करण्यात येणार आहे.