शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
6
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
7
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
8
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
9
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
10
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
11
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
12
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
13
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
14
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
15
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
17
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
18
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
19
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
20
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास

ऐरोलीत सलग १७ तास बत्तीगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:07 AM

बारावीच्या परीक्षार्थींची गैरसाय : महावितरणविरोधात असंतोष

नवी मुंबई : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. बुधवारी ऐरोली विभागात सलग १७ तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या प्रकाराबद्दल रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, किमान परीक्षेच्या कालावधीत तरी विजेचा लंपडाव थांबवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

घणसोली, ऐरोली विभागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युतपुरवठा खंडित होणे, डीपी बॉक्सला आग लागणे, उघड्या केबल्स, शॉर्टसर्किटच्या वाढत्या घटना आदी प्रकारामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा खंडित होतो. तो पूर्ववत करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. बुधवारी रात्री अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीला आग लागल्याने पहाटे ४ ते रात्री ९ वाजेतपर्यंत विद्युतपुरवठा खंडित झाला. तब्बल १७ तास विद्युतपुरवठा पूर्ववत न झाल्याने बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे, सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर शुक्रवारपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. अशातच बुधवारी तब्बल १७ तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

ऐरोली-गोठीवली दरम्यान वीजपुरवठा करणाºया केबल्सला आग लागल्याने या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यास विलंब लागल्याचे महावितरणच्या ऐरोली विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश शिंपी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.