शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

टीकेनंतर माथाडी नेते एकाच व्यासपीठावर, संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 04:15 IST

माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवी मुंबई : माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परस्परांवरील टीकेनंतर मंगळवारी सर्व नेते एकाच व्यासपीठावर येऊन कामगारांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला व संघटना राजकारणापासून दूर ठेवण्याचे आश्वासन दिले.कळंबोलीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. शासन माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर संघटनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे व जगताप यांच्यावर टीका केली होती. संघटनेमध्ये राजकारण सुरू झाल्याची टीका करून आता गद्दार ओळखण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर संघटनेमध्ये राजकीय फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. २३ मार्चला माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. नेत्यांनी राजकारण व समाजकारण वेगळे ठेवावे, असे आवाहन कामगारांनी केले.माथाडी नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनीही कामगारांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यापुढे अण्णासाहेबांची संघटना राजकारणापासून दूर ठेवून जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे कामगारांमधील संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असला तरी ही एकजूट कायमस्वरूपी टिकणार का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. २३ मार्चला होणाऱ्या मेळाव्यात कोण काय भूमिका घेणार याविषयीही उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण