शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

टीकेनंतर माथाडी नेते एकाच व्यासपीठावर, संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 04:15 IST

माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवी मुंबई : माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परस्परांवरील टीकेनंतर मंगळवारी सर्व नेते एकाच व्यासपीठावर येऊन कामगारांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला व संघटना राजकारणापासून दूर ठेवण्याचे आश्वासन दिले.कळंबोलीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. शासन माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर संघटनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे व जगताप यांच्यावर टीका केली होती. संघटनेमध्ये राजकारण सुरू झाल्याची टीका करून आता गद्दार ओळखण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर संघटनेमध्ये राजकीय फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. २३ मार्चला माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. नेत्यांनी राजकारण व समाजकारण वेगळे ठेवावे, असे आवाहन कामगारांनी केले.माथाडी नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनीही कामगारांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यापुढे अण्णासाहेबांची संघटना राजकारणापासून दूर ठेवून जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे कामगारांमधील संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असला तरी ही एकजूट कायमस्वरूपी टिकणार का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. २३ मार्चला होणाऱ्या मेळाव्यात कोण काय भूमिका घेणार याविषयीही उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण