शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटनेनंतरही महावितरण निद्रिस्तच, घणसोलीसह ऐरोलीमध्ये परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:57 IST

कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत.

- अनंत पाटीलनवी मुंबई : कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. ऐरोली ते घणसोली दरम्यानची स्थिती बिकट असून, वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घणसोली गावठाण, ऐरोली, दिवा कोळीवाडामधील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये महावितरणने उभ्या केलेल्या विद्युत रोहित्रांच्या डीपी उघड्याच असल्याने शाळकरी विद्यार्थी, तसेच वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घणसोली विभागात २५पेक्षा जास्त बॉक्स उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. घणसोली परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि महावितरणकडे अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापलिकेचे सहायक आयुक्त आणि विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सखाराम खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, उघड्या डीपी बॉक्सची समस्या कायम असून, महापालिकेच्या वतीने लेखी तक्र ार करून आता तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही गेला असल्याचे सांगितले.दिवा-कोळीवाडा सेक्टर ९ येथे होळी मैदानाच्या शेजारी या अंतर्गत विजेचा दाब नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे. येथील रोहित्रासह डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. घणसोली गावदेवी मंदिर, कोळीवाडा, शेतकरी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, पाटीलआळी, चिंचआळी, दत्तनगर, तळवली गाव, नोसिलनाका सेक्टर २१, छत्रपती शिवाजी तलाव, खदान तलाव, वैभव पतपेढी जवळ, रबाळे स्मशानभूमी, वीटभट्टी रोड, रबाळे रेल्वेस्थानक, गोठीवली महावितरण कार्यालयाजवळ, मासळी मार्केट साईबाबा मंदिर, गोल्डननगर, गोठीवली विठ्ठल-रखुमाई मंदिर यांच्यासह एकूण २५ डीपी बॉक्सची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. डीपीतील वीज तारा, उघडे फ्युज, सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला येतील, अशा पद्धतीने हे बॉक्स आहेत, तसेच रस्त्याच्या कडेला एखादा अपघात झाला तर उघड्या डीपीवर वाहन आदळून मोठी घटनाही घडू शकते.डीपीचे दरवाजे तारेने बांधलेले असल्याचे पाहावयास मिळतात. दिवा-कोळीवाडा होळी मैदान परिसरातील डीपीचे आणि जनित्रांचे दरवाजे वर्षाचे बाराही महिने खुलेच असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही.उघड्या डीपी बॉक्स आणि ओव्हरहेड जीर्ण केबल्स संदर्भात घणसोली विभागातील शेकडो लोकांच्या तक्र ारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही ५० ठिकाणी सर्वेक्षण केले असता, यात २५ ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका असल्याची गंभीर परिस्थिती आढळून आल्याने यासंदर्भात वीज महावितरण कंपनीकडे दुरु स्तीबाबत तीन आठवड्यापूर्वी लेखी तक्र ार केली आहे.- दत्तात्रेय नागरे, सहायक आयुक्त, घणसोली, महापालिकानवी मुंबई महापलिकेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने उघड्या डीपी बॉक्स विषयी महावितरणकडे लेखी तक्र ार करण्यात आलेली आहे. दुरु स्तीसाठी ठेकेदारामार्फत डीपी बॉक्स लॉकिंगचे आणि उघड्या केबल्स नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण होणार असल्यामुळे उघड्या डीपीचा प्रश्न कायमचा सुटेल.- दीपक शिंदे, सहायक अभियंता, वीज महावितरण ऐरोली विभाग.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई