शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 23:55 IST

शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक रीतीने सांभाळून प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचा निर्धार श्रुतीशा यांनी लोकमत कडे व्यक्त केला आहे.

योगेश पिंगळे नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २0१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नेरुळ येथील श्रुतीशा पटाडे (२५) यांनी उज्वल यश संपादन केले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक रीतीने सांभाळून प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचा निर्धार श्रुतीशा यांनी लोकमतकडे व्यक्त केला आहे.आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो.परंतु त्यासाठी काहीतरी करण्याची संधी हि प्रशासनातूनच मिळेल या भावनेतून इंजिनियरिंग केल्यावर श्रुतीशा यांनी नोकरी न करता पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांचा जिद्दीने अभ्यास केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना घवघवीत यश देखील मिळाले असून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. या यशामुळे श्रुतीशा यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. श्रुतीशा यांचे बालपण नवी मुंबईत गेले असून वाशीतील फादर अ‍ॅग्नेल शाळेत शिक्षण झाले आहे. वडील सुभाष पटाडे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असून आई सविता पटाडे गृहिणी आहेत. दहावीनंतर विविध पुस्तके, वर्तमानपत्र आदी अवांतर वाचनातून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळते त्यातूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाबाबत कुतूहल निर्माण झाल्याचे श्रुतीशा यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी होऊन चांगलं काम करता येऊ शकते. तसेच या कामात खूप संधी आहेत. परंतु हे काम एक आव्हानात्मक असल्याचे देखील त्यांच्या लक्षात आले होते. परंतु प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचे असल्याने त्याअनुषंगाने त्यांनी प्रयत्न करून यश संपादन केले. आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घरी अभ्यास करणे जरा कठीण असल्याने लायब्ररीमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला होता. स्वप्न गाठण्यासाठी चिकाटीने केलेल्या मेहनतीचे फळ श्रुतीशा यांना मिळाले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून उपजिल्हाधिकारी पदावर काम करणार असून शासनाने दिलेली जबाबदारी १00 टक्के देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाची ध्येय, धोरणे, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असून जास्तीत जास्त महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रुतीशा यांनी सांगितले. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार उपलब्ध करून देणं हे सर्व शासनामार्फत जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं जीवनात आपण आपले ध्येय निश्चित केले तर आपण परिस्थिती नक्कीच बदलू त्यासाठी जिद्द, चिकाटी, विश्वासाची साथ हवी. ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगले प्रयत्न देखील आवश्यक असून आपल्या आयुष्यात येणाºया प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघा. यश हमखास आहे. असा सल्ला त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया तरुणाईला दिला आहे. श्रुतीशा यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.>श्रुतीशा यांचे बालपण नवी मुंबईत गेले असून वाशीतील फादर अ‍ॅग्नेल शाळेत शिक्षण झाले आहे. वडील सुभाष पटाडे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत.