शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांवर कारवाई होणारच, कारवाईसाठी बंदोबस्ताची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 07:09 IST

महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई सुरूच राहणार आहे. सिडको कार्यक्षेत्रातील ६५ बांधकामांसाठी सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ४१२ बांधकामे निष्कासित करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई सुरूच राहणार आहे. सिडको कार्यक्षेत्रातील ६५ बांधकामांसाठी सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ४१२ बांधकामे निष्कासित करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू आहे. १ जुलै रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीची बैठक आयुक्त रामास्वामी एन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अमरिश पटनिगिरे, दादासाहेब चाबुकस्वार, सर्व विभाग अधिकारी, सिडको, एमआयडीसी, वन विभाग व पोलीस अधिकारी उपस्थित होते. मनपा क्षेत्रातील ५०१ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार आहे. त्यामध्ये सिडकोच्या जागेवरील ३७७ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे. बैठकीमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १४, सिडकोच्या जागेवर ३१२ व याशिवाय नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलेली ६५ अशी एकूण ३७७ एमआयडीसीच्या जागेवरील १००, वन विभागाच्या जागेवर ७ कांदळवन १, रेल्वेच्या जागेवर २ अशी एकूण ५०१ अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत चर्चा करण्यात आली.सर्व प्राधिकरणांना निष्कासन कार्यवाहीचा आराखडा सादर करण्यासाठी सूचित करण्यात आले होते. सिडकोच्या जागेवरील नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या ६५ धार्मिक स्थळांसाठी १ महिन्याच्या कालावधीत सूचना, हरकती मागवल्या आहेत. सिडकोकडील ३१२, एमआयडीसीकडील १०० अनधिकृत धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.पोलीस स्टेशनमध्येही कारवाईशासकीय कार्यालये व पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरही महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालय व शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.