शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार?

By admin | Updated: October 16, 2015 02:32 IST

दिघा परिसरात अनधिकृत ईमारती बांधून ३,५४९ कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई दिघा परिसरात अनधिकृत ईमारती बांधून ३,५४९ कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. यामुळे आता अतिक्रमण बांधणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना फसविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सुनियोजित शहर असणाऱ्या नवी मुंबईमध्ये भुमाफीयांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. दिघा परिसरात सिडको व एमआयडीसीच्या जागेवर तब्बल ९९ अनधिकृत ईमारती उभारण्यात आल्याची तक्रार २००९ मध्ये सामाजीक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी केली होती. परंतू महापालिकेसह इतर प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याने त्यांनी न्यायालयात जनहीत याचीका दाखल केली. उच्च न्यायालयाने सर्व अनधिकृत ईमारती पाडण्याचे आदेश दिले असून प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यामुळे या ईमारतींमध्ये घर घेणारे ३२६० व व्यवसायीक गाळे घेणाऱ्या २८९ जणांचे जवळपास अडीचशे कोटी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांनी आयुष्यभर कमावलेली रक्कम व कर्ज घेवून या इमारतींमध्ये घरे घेतली आहेत. या सर्व रंिहवाशांची फसवणूक झाली आहे. बांधकाम व्यवसायीकांनी कोणतीही बांधकाम परवानगी न घेता ईमारती उभ्या केल्या आहेत. येथील घरे सामान्य नागरिकांना विकून प्रचंड पैसा कमाविला आहे. या प्रकरणी बिल्डरांवर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतू महापालिका , सिडको व एमआयडीसी प्रशासनाने कोणाही विरोधात गुन्हे दाखल केले नव्हते. तक्रार नसल्यामुळे पोलिसांनीही गुन्हे दाखल केले नव्हते. कारवाई होत नसल्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारांचे मनोबल वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी अद्याप अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. जो पर्यंत बांधकाम करणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार नाही तो पर्यंत अतिक्रमणे थांबणार नाहीत. संबंधीतांवर गुन्हे दाखल करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.