शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार?

By admin | Updated: October 16, 2015 02:32 IST

दिघा परिसरात अनधिकृत ईमारती बांधून ३,५४९ कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई दिघा परिसरात अनधिकृत ईमारती बांधून ३,५४९ कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. यामुळे आता अतिक्रमण बांधणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना फसविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सुनियोजित शहर असणाऱ्या नवी मुंबईमध्ये भुमाफीयांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. दिघा परिसरात सिडको व एमआयडीसीच्या जागेवर तब्बल ९९ अनधिकृत ईमारती उभारण्यात आल्याची तक्रार २००९ मध्ये सामाजीक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी केली होती. परंतू महापालिकेसह इतर प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याने त्यांनी न्यायालयात जनहीत याचीका दाखल केली. उच्च न्यायालयाने सर्व अनधिकृत ईमारती पाडण्याचे आदेश दिले असून प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यामुळे या ईमारतींमध्ये घर घेणारे ३२६० व व्यवसायीक गाळे घेणाऱ्या २८९ जणांचे जवळपास अडीचशे कोटी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांनी आयुष्यभर कमावलेली रक्कम व कर्ज घेवून या इमारतींमध्ये घरे घेतली आहेत. या सर्व रंिहवाशांची फसवणूक झाली आहे. बांधकाम व्यवसायीकांनी कोणतीही बांधकाम परवानगी न घेता ईमारती उभ्या केल्या आहेत. येथील घरे सामान्य नागरिकांना विकून प्रचंड पैसा कमाविला आहे. या प्रकरणी बिल्डरांवर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतू महापालिका , सिडको व एमआयडीसी प्रशासनाने कोणाही विरोधात गुन्हे दाखल केले नव्हते. तक्रार नसल्यामुळे पोलिसांनीही गुन्हे दाखल केले नव्हते. कारवाई होत नसल्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारांचे मनोबल वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी अद्याप अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. जो पर्यंत बांधकाम करणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार नाही तो पर्यंत अतिक्रमणे थांबणार नाहीत. संबंधीतांवर गुन्हे दाखल करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.