शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

मंदिरांवर कारवाई, पानटप-यांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:21 IST

पनवेल व नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे

नामदेव मोरे नवी मुंबई : पनवेल व नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. मंदिरांवरही कारवाई करणा-या प्रशासनाने हॉटेलबाहेरील पानटपºयांना अभय देण्यास सुरुवात केली आहे. पानटपरी चालकाकडून १० ते ४० हजाररुपये भाडे वसुली केली जात असून, चोरून वीजपुरवठा सुरू आहे. अतिक्रमणांना अभय देऊन प्रशासन सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास चालना देऊ लागले आहे.पनवेलमध्ये बारबाहेरील पानटपरीवरून झालेला वाद विकोपाला गेल्याने दोन गटांत राडा झाला. हॉटेलमध्ये बॅट व इतर अवजारांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हॉटेल बाहेरील अनधिकृत टपºयांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये छोटी - मोठी पाच हजारपेक्षा जास्त हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर अनधिकृतपणे पानटपरी सुरू करण्यात आली आहे. पानटपºयांमध्ये प्रचंड मोठे अर्थकारण दडले आहे. हॉटेल चालक सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करून टपरी उभारत असून, ती १० ते ४० हजार रुपये भाडे आकारून परप्रांतीयांना चालविण्यासाठी देत आहेत. हॉटेलसाठी अनधिकृतपणे वीजपुरवठा दिला जात आहे. पानटपरीमध्ये विडी, सिगारेटपासून बंदी असलेला गुटखाही बिनधास्तपणे विकला जात आहे. बारबाहेरील ८० टक्के टपºयांमध्ये गुटखा विक्रीसाठी ठेवला जात आहे. पानटपरीबाहेर पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत धूम्रपान सुरू असते. बिनधास्तपणे सुरू असलेल्या धूम्रपानाचा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे.महापालिका प्रशासनाने शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहिमा सुरू केल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई केली जात आहे. माथाडी व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी केलेल्या बांधकामांवरही कारवाई केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी धार्मिक स्थळांवरही कारवाई सुरू आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाºया हॉटेलबाहेरील पानटपºयांवर मात्र कधीच कारवाई करण्यात येत नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वर्षभरात एकाही पानटपरीवर कारवाई केलेली नाही. पानटपºयांना अभय देण्यामध्ये मोठे अर्थकारण दडल्याने जाणीवपूर्वक पानटपºयांवर कारवाई केली जात नाही. यामुळे दक्ष नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या घरांवर हातोडा चालविणाºया प्रशासनाने अनधिकृत टपºया सर्वप्रथम हटवाव्या व त्यांना अभय देणाºया हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.वीजचोरीकडे दुर्लक्ष : गणेशोत्सव व नवरात्री उत्सव मंडळांना दहा दिवसांसाठी स्वतंत्र वीजमीटर घेण्याची सक्ती केली जाते. अधिकृत वीजमीटर न घेणाºया मंडळांवर गुन्हे दाखल केले जातात; परंतु शहरातील सर्व अनधिकृत टपºयांना हॉटेलमधून चोरून वीज दिली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वीजमीटरची सक्ती करणारे महावितरण प्रशासनही पानटपºयांसाठीच्या वीजचोरीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.नागरिकांचेआरोग्य धोक्यातपानटपºयांच्या बाहेर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत धूम्रपान सुरू असते. या परिसरातून ये - जा करणाºया नागरिकांना सिगारेटच्या उग्र वासामुळे श्वास घेण्यासही त्रास होत आहे. बिनधास्तपणे सुरू असलेल्या धूम्रपानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होवू लागला असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.