शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बावखळेश्वर मंदिरावर कारवाई अटळ, सर्वोच्च न्यायालयाचा दणका, १५ फेब्रुवारीपर्यंत बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:35 IST

बहुचर्चित बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते.

नवी मुंबई : बहुचर्चित बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत मंदिर ट्रस्टने स्वत:हून मंदिराचे बांधकाम तोडले नाही, तर एमआयडीसीने पोलीस बळाचा वापर करून हे बांधकाम पाडून टाकावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.पावणे एमआयडीसीत २००७मध्ये सुमारे २ हजार चौरस मीटर जागेवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. २०१०मध्ये एमआयडीसीने या मंदिराला नोटीस बजावली होती. यासंदर्भात समाजसेवक संदीप ठाकूर यांनी २०१३मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार मे २०१७मध्ये उच्च न्यायालयाने हे मंदिर तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात मंदिर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या मंदिराची जमीन बाजारभावाने विकत घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मंदिर ट्रस्टच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. परंतु एमआयडीसी आणि याचिकाकर्ते संदीप ठाकूर यांच्या वकिलांनी यावर हरकत घेत ही जागा ओपन स्पेसची असून ती विकता येत नाही, असे सांगितले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मंदिराच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मंदिर वाचविण्यासाठी ट्रस्टच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे...तर पोलीस बळाचा वापरमंदिराचे बांधकाम स्वत:हून तोडण्यासाठी ट्रस्टने १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागत तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे.या मुदतीच्या आत ट्रस्टने मंदिराचे बांधकाम पाडून टाकले नाही, तर एमआयडीसीने पोलीस बळाचा वापर करून त्यावर कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय