शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीजबिल वसुलीची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 16:54 IST

नोव्हेंबर महिन्यात वीज बिल न भरणाऱ्या ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित 

नवी मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील  उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटीची आहे. यामध्ये,चालू बिल जोडल्यास सदर थकबाकी ६७५ कोटीच्या घरात आहे. महावितरणवर थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे व वीज ग्राहक वीजबिल भरणावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे, महावितरणची आर्थिक स्थिती बिगडत आहे. विविध माध्यमातून वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी आपले वीज बिल भरले नाहीत. सध्या, कंपनीची आर्थिक स्तिथी अत्यंत वाईट असून नाईलाजाने महावितरणला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार वसुलीची धडक मोहीम भांडूप परिमंडलाने  सुरु केली असून त्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत . त्यानुसार, १ नोव्हेंबर पासून ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. 

भांडूप परिमंडलात घरघुती  ग्राहकांची थकबाकी – ५१.८९ कोटी, वाणिज्यिक ग्राहकांची थकबाकी – २४.७२ कोटी,  औद्योगिक ग्राहकांची थकबाकी – ५१.५२ कोटी, कृषी ग्राहकांची- २.२१ कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी- १६८.२० कोटी, पाणी पुरवठा योजनांची थकबाकी ५.५५ कोटीवर तर इतर ग्राहकांची थकबाकी – ८.४५ कोटी झाली आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार, भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता शधनंजय औंढेकर  यांनी परिमंडलांतर्गत सर्व कार्यालयांना धडक कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले असून, आतापर्यंत ६४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे मंडळात १८१५ , वाशी मंडळात ३०८७ तर पेण मंडळात १५७२ ग्राहकांचा समावेश आहे.     

मुख्य अभियंता औंढेकर  म्हणाले की, “ महावितरण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते.  आपल्या जीवाची परवा न करता महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी झटत असतात. ग्राहकांना वारंवार विनंती करून ही थकबाकीदार ग्राहक वीज बिल भारत नाही. महावितरणची थकबाकी वाढत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बघता नाईलाजाने महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.  वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून  ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करावे. सध्या महावितरणच्या कँश कलेक्शन सेंटर शनिवार व रविवार सुद्धा चालू ठेवण्यात आले आहेत. तरी,सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. याशिवाय, महावितरणच्या संकेत स्थळावर किंवा महावितरण मोबाईल अँप द्वारे ही वीजबिल भरता येते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण