शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीजबिल वसुलीची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 16:54 IST

नोव्हेंबर महिन्यात वीज बिल न भरणाऱ्या ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित 

नवी मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील  उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटीची आहे. यामध्ये,चालू बिल जोडल्यास सदर थकबाकी ६७५ कोटीच्या घरात आहे. महावितरणवर थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे व वीज ग्राहक वीजबिल भरणावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे, महावितरणची आर्थिक स्थिती बिगडत आहे. विविध माध्यमातून वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी आपले वीज बिल भरले नाहीत. सध्या, कंपनीची आर्थिक स्तिथी अत्यंत वाईट असून नाईलाजाने महावितरणला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार वसुलीची धडक मोहीम भांडूप परिमंडलाने  सुरु केली असून त्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत . त्यानुसार, १ नोव्हेंबर पासून ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. 

भांडूप परिमंडलात घरघुती  ग्राहकांची थकबाकी – ५१.८९ कोटी, वाणिज्यिक ग्राहकांची थकबाकी – २४.७२ कोटी,  औद्योगिक ग्राहकांची थकबाकी – ५१.५२ कोटी, कृषी ग्राहकांची- २.२१ कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी- १६८.२० कोटी, पाणी पुरवठा योजनांची थकबाकी ५.५५ कोटीवर तर इतर ग्राहकांची थकबाकी – ८.४५ कोटी झाली आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार, भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता शधनंजय औंढेकर  यांनी परिमंडलांतर्गत सर्व कार्यालयांना धडक कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले असून, आतापर्यंत ६४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे मंडळात १८१५ , वाशी मंडळात ३०८७ तर पेण मंडळात १५७२ ग्राहकांचा समावेश आहे.     

मुख्य अभियंता औंढेकर  म्हणाले की, “ महावितरण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते.  आपल्या जीवाची परवा न करता महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी झटत असतात. ग्राहकांना वारंवार विनंती करून ही थकबाकीदार ग्राहक वीज बिल भारत नाही. महावितरणची थकबाकी वाढत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बघता नाईलाजाने महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.  वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून  ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करावे. सध्या महावितरणच्या कँश कलेक्शन सेंटर शनिवार व रविवार सुद्धा चालू ठेवण्यात आले आहेत. तरी,सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. याशिवाय, महावितरणच्या संकेत स्थळावर किंवा महावितरण मोबाईल अँप द्वारे ही वीजबिल भरता येते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण