शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

काँग्रेस चिंतन बैठकीत आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: November 5, 2014 05:03 IST

पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघापैकी पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला तीस हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही

दिपक मोहिते, वसईपालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघापैकी पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला तीस हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. काँग्रेसचा एकही उमेदवार या जिल्ह्यात विजयी झाला नाही. हे राजकीय वास्तव असतानाही पराभवावर चिंतन करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत चिंतन होण्या ऐवजी चिंताजनक वाटावे असे आरोप-प्रत्यारोपांचे युद्धच घडून आले. एका पदाधिकाऱ्याने पक्षाच्या अधिकाऱ्यांनी विरोधकांकडून पैसे खाऊन स्वपक्षाचे उमेदवार पाडले असा खळबळजनक आरोप करताच सभेतील सगळेच खवळले. तर माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सभात्याग केला त्यामुळे ही बैठक मनोमिलना ऐवजी रणकंदन घडविणारी ठरली.वसई व पालघर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर पक्षाने चिंतन बैठका घेतल्या परंतु या बैठकीमध्ये चिंतन होण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. तरीही पुन्हा पक्षाला बळ द्यायचा निर्णय घेण्यात आला. वसई येथे झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. तर पालघर येथे एका गटाने पक्षबांधणीकडे लक्ष न दिल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप केला.राज्यात दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. पक्षात झालेल्या पराभवाबाबत चिंतन तसेच पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी वसई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी चिंतनाऐवजी एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र सुरू ठेवले. एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप केल्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी कोणी पैसे घेतली असतील त्यांची नावे जाहीर करा म्हणून त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मागे तगादा लावला परंतु त्या पदाधिकाऱ्यांची नावे मात्र त्यांनी शेवटपर्यंत सांगितली नाहीत. उलट ज्या पदाधिकाऱ्याने आरोप केला होता त्या पदाधिकाऱ्यालाच तू प्रचार न करता घरी झोपून राहीलास असा घरचा आहेर मिळाला. पालघर येथेही झालेल्या चिंतन बैठकीमध्ये चिंतनाऐवजी आरोपाच्या फैरी झडल्या. पक्षाचे उमेदवार व तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनाही एका गटाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पक्षबांधणीला महत्व न देणे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे अशा नीतीमुळे पक्षाचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला. एकंदरीत बैठकीतील वातावरण लक्षात घेऊन गावित यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले.पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात काँगे्रस पक्षाच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला ३० हजाराचा पल्ला गाठता आला नाही. बोईसर येथे देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारापासून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दूर राहणे पसंत केले. वसई व नालासोपाऱ्यामध्येही अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार करणे टाळले. या सर्व घडामोडीवरून काँग्रेसला पुन्हा पक्षबांधणीकडे लक्ष द्यावे लागणार आहे हे स्पष्ट होते. पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील हेवेदावे हे पक्षबांधणीच्या मार्गातील प्रमुख अडथळे आहेत. परंतु आजवर एकाही वरीष्ठ नेत्याने त्यावर उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही केली नाही. पालघर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५ वर्षात भेटी देऊनही काँग्रेस पक्षाला बळकटी येऊ शकली नाही. एवढे महाभारत घडून गेल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मानसिकतेत बदल होऊ शकला नाही हे या चिंतन बैठकीवरून स्पष्ट झाले आहे.