शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशी खाडीपुलावर अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:21 IST

सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलावर अनेक महिन्यांपासून अंधार आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलावर अनेक महिन्यांपासून अंधार आहे. विद्युत दिवे बंद असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांसह पोलिसांनी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवे बंद असल्यामुळे सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलने केली होती. आंदोलनानंतर जवळपास एका वर्षाने पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत; परंतु मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावरील अंधार अद्याप दूर झालेला नाही. अनेक महिन्यांपासून येथील सर्व पथदिवे बंदच आहेत. यामुळे रात्री अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मोटारसायकलचे अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.या विषयी वाहतूक पोलिसांनी अनेक पत्र बांधकाम विभागाला दिली आहेत; परंतु सर्व पत्रांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गावरून रोज दोन ते तीन लाख प्रवासी जात असतात. प्रमुख मार्गावरील असणारा अंधार पाहून प्रवासीही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. रात्री अंधारामुळे किरकोळ अपघात होऊन वाहतूककोंडी निर्माण होते. वाहनांच्या मोठ्या रांगा टोलनाक्यापर्यंत लागत असून, अशीच स्थिती राहिली तर गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वाशी खाडीपुलाचे बांधकाम केल्यानंतर टोलनाका सुरू केला आहे. मुंबईत जाणाºया व येणाºया प्रत्येक वाहनाकडून टोल वसुली केली जात आहे. टोलनाक्यापासून काही मीटर अंतरावर अंधार आहे. यामुळे वाहनधारक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.गंभीर अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खाडीपुलावरील अंधार लवकर दूर करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही प्रवासी व वाहनधारकांनी दिला आहे.>पुलाची सुरक्षाही धोक्यातवाहतूक सुरळीत राहण्यासाठी खाडीपुलावरील दिवे सुरू असणे आवश्यक आहे. याहीपेक्षा पुलाच्या सुरक्षेसाठीही येथे रात्री पथदिवे सुरू असणे आवश्यक आहे. पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व गोष्टी पाहता येथील पथदिवे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे.>पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्षवाहतूक पोलिसांनी खाडीपुलावरील अंधाराविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक पत्र दिले आहेत. अंधार असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय किरकोळ अपघातामुळे वाहतूककोंडी होऊन कर्मचाºयांवर ताण निर्माण होत आहे; परंतु या पत्रांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.