शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 04:37 IST

झाकणाविना गटारे : दुचाकीस्वारांचा ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास असुरक्षित

नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दुचाकीस्वारांचा प्रवास असुरक्षित झाला आहे. रस्त्यालगतची गटारे अनेक महिन्यांपासून उघडीच असल्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण होत आहे, तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान काढलेला गटारातील गाळही रस्त्यालगतच पडून आहे.

नवी मुंबईला ठाण्याशी जोडण्याकरिता ठाणे-बेलापूर मार्ग महत्त्वाचा ठरत आहे. सदर मार्गावर पूर्वी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच जलद गतीची झाली आहे. त्यानुसार या मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते; परंतु अनेक ठिकाणी रस्त्यालगतची गटारे उघडीच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे, ऐरोलीसह इतर अनेक ठिकाणी हे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ही गटारे बनवण्यात आली आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी ती सुरुवातीपासूनच उघडी आहेत. तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान सफाईसाठी उघडल्यानंतर ती बंदिस्त करण्यात आलेली नाहीत. शिवाय, त्यामधून काढलेला गाळही अनेक महिन्यांपासून रस्त्यालगतच पडून आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूलाच ही उघडी गटारे आहेत.कार्यवाहीची मागणीएखाद्या भरधाव अवजड वाहनापासून सुरक्षित राहण्यासाठी डाव्या बाजूने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराला अशा उघड्या गटारांमुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर जागोजागी निर्माण झालेली अपघातसदृश परिस्थिती दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल नाईक यांनी केली आहे. बोनकोडे येथे राहणारे हर्षल हे सदर मार्गाने खासगी वाहनातून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी ही उघडी गटारे अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करत ती बंदिस्त करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNavi Mumbaiनवी मुंबई