शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 04:37 IST

झाकणाविना गटारे : दुचाकीस्वारांचा ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास असुरक्षित

नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दुचाकीस्वारांचा प्रवास असुरक्षित झाला आहे. रस्त्यालगतची गटारे अनेक महिन्यांपासून उघडीच असल्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण होत आहे, तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान काढलेला गटारातील गाळही रस्त्यालगतच पडून आहे.

नवी मुंबईला ठाण्याशी जोडण्याकरिता ठाणे-बेलापूर मार्ग महत्त्वाचा ठरत आहे. सदर मार्गावर पूर्वी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच जलद गतीची झाली आहे. त्यानुसार या मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते; परंतु अनेक ठिकाणी रस्त्यालगतची गटारे उघडीच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे, ऐरोलीसह इतर अनेक ठिकाणी हे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ही गटारे बनवण्यात आली आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी ती सुरुवातीपासूनच उघडी आहेत. तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान सफाईसाठी उघडल्यानंतर ती बंदिस्त करण्यात आलेली नाहीत. शिवाय, त्यामधून काढलेला गाळही अनेक महिन्यांपासून रस्त्यालगतच पडून आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूलाच ही उघडी गटारे आहेत.कार्यवाहीची मागणीएखाद्या भरधाव अवजड वाहनापासून सुरक्षित राहण्यासाठी डाव्या बाजूने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराला अशा उघड्या गटारांमुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर जागोजागी निर्माण झालेली अपघातसदृश परिस्थिती दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल नाईक यांनी केली आहे. बोनकोडे येथे राहणारे हर्षल हे सदर मार्गाने खासगी वाहनातून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी ही उघडी गटारे अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करत ती बंदिस्त करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNavi Mumbaiनवी मुंबई