शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 04:37 IST

झाकणाविना गटारे : दुचाकीस्वारांचा ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास असुरक्षित

नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दुचाकीस्वारांचा प्रवास असुरक्षित झाला आहे. रस्त्यालगतची गटारे अनेक महिन्यांपासून उघडीच असल्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण होत आहे, तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान काढलेला गटारातील गाळही रस्त्यालगतच पडून आहे.

नवी मुंबईला ठाण्याशी जोडण्याकरिता ठाणे-बेलापूर मार्ग महत्त्वाचा ठरत आहे. सदर मार्गावर पूर्वी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच जलद गतीची झाली आहे. त्यानुसार या मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते; परंतु अनेक ठिकाणी रस्त्यालगतची गटारे उघडीच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे, ऐरोलीसह इतर अनेक ठिकाणी हे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ही गटारे बनवण्यात आली आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी ती सुरुवातीपासूनच उघडी आहेत. तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान सफाईसाठी उघडल्यानंतर ती बंदिस्त करण्यात आलेली नाहीत. शिवाय, त्यामधून काढलेला गाळही अनेक महिन्यांपासून रस्त्यालगतच पडून आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूलाच ही उघडी गटारे आहेत.कार्यवाहीची मागणीएखाद्या भरधाव अवजड वाहनापासून सुरक्षित राहण्यासाठी डाव्या बाजूने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराला अशा उघड्या गटारांमुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर जागोजागी निर्माण झालेली अपघातसदृश परिस्थिती दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल नाईक यांनी केली आहे. बोनकोडे येथे राहणारे हर्षल हे सदर मार्गाने खासगी वाहनातून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी ही उघडी गटारे अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करत ती बंदिस्त करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNavi Mumbaiनवी मुंबई