शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

सायन-पनवेल महामार्गावरील रेतीमुळे अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:26 IST

सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेली बारीक रेती आणि काचेचे तुकडे, दगड यामुळे दुचाकी वाहने घसरत असून, लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेली बारीक रेती आणि काचेचे तुकडे, दगड यामुळे दुचाकी वाहने घसरत असून, लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या महामार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.मुंबई-पुणे या मार्गाला जोडणारा सायन-पनवेल महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गावर दिवसाला लाखो वाहने ये-जा करीत असतात. दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे महामार्ग अपुरा पडू लागल्याने होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी महामार्गचे रुं दीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना या महामार्गावर उरणफाटा, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा आदी भागात उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या महामार्गाची स्वच्छता केली जात नाही, त्यामुळे या महामार्गावर उरणफाटा ते वाशी टोलनाक्यापर्यंतच्या भागात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर रेती, खडी, काचेचे तुकडे, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा पसरले आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलांवरही मोठ्या प्रमाणावर रेती आणि खडी पसरलेली असून, महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळेही रेती महामार्गाच्या कडेला पसरलेली आहे.महामार्गावरून जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने हलकी वाहने एका बाजूने ये-जा करतात. महामार्गाच्या एका बाजूने ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना रेती आणिखडीमुळे कमालीची कसरत करावी लागत आहे.अनेक वेळा रेती आणि खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. या महामार्गाच्या स्वच्छतेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचेदुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत असून, वेळोवेळी स्वच्छता करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.