शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सायन-पनवेल महामार्गावरील रेतीमुळे अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:26 IST

सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेली बारीक रेती आणि काचेचे तुकडे, दगड यामुळे दुचाकी वाहने घसरत असून, लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेली बारीक रेती आणि काचेचे तुकडे, दगड यामुळे दुचाकी वाहने घसरत असून, लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या महामार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.मुंबई-पुणे या मार्गाला जोडणारा सायन-पनवेल महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गावर दिवसाला लाखो वाहने ये-जा करीत असतात. दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे महामार्ग अपुरा पडू लागल्याने होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी महामार्गचे रुं दीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना या महामार्गावर उरणफाटा, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा आदी भागात उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या महामार्गाची स्वच्छता केली जात नाही, त्यामुळे या महामार्गावर उरणफाटा ते वाशी टोलनाक्यापर्यंतच्या भागात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर रेती, खडी, काचेचे तुकडे, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा पसरले आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलांवरही मोठ्या प्रमाणावर रेती आणि खडी पसरलेली असून, महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळेही रेती महामार्गाच्या कडेला पसरलेली आहे.महामार्गावरून जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने हलकी वाहने एका बाजूने ये-जा करतात. महामार्गाच्या एका बाजूने ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना रेती आणिखडीमुळे कमालीची कसरत करावी लागत आहे.अनेक वेळा रेती आणि खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. या महामार्गाच्या स्वच्छतेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचेदुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत असून, वेळोवेळी स्वच्छता करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.