शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

विरार-वसई-पनवेल दुपदरीकरणासह कळवा-ऐरोली लिंकला गती

By नारायण जाधव | Updated: August 11, 2022 15:18 IST

एमयुटीपी-३ ला राज्य शासनाचा ४५ कोटींचा बुस्टर

 - नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महामुंबईतील उपनगरीय सेवांमध्ये सुधारणा करून विविध सेवा पुरविण्यासाठी रेल्वे विकास महामंडळाकडून एमयुटीपी-३ हा १० हजार ९४७ कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाची ५०/५० टक्के हस्सेदारी असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने वितरीत करावयाची आहे. यातील एमआरव्हीसीच्या मागणीनुसार राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी आणि ४५ काेटी २२ लाख ७८ हजार रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली. यामुळे एमयुटीपी-३ मधील अनेक कामांना गती मिळणार आहे.

आतापर्यंत दिले होते ५२ कोटीयानुसार राज्य शासनाने आतापर्यंत २०२०-२१ मध्ये १५ काेटी तीन लाख ४४ हजार तर २०२१-२२ मध्ये ३७ कोटी ३१ लाख ४३ हजार असे ५२ कोटी ३४ लाख ८७ हजार रुपये वितरीत केलेले आहेतकाय आहे एमयुटीपी-३ चा करारनामाएमयुटीपी-३ राबविण्यासाठी एसबीआय बँकेने ३५०० कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून याठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, एसबीआय आणि एमआरव्हीसी यांच्यात २४ ऑगस्ट २०२० रोजी करारनामा झालेला आहे. तर या प्रकल्पासाठीची राज्य शासनाच्या वतीने वहन एमएमआरडीए आणि सिडकोने वहन कराववयाीच रक्कम विविध हप्त्यांमध्ये एमआरव्हीसीला द्यायची आहे. यानंतर एमआरव्हीसीने खर्च केलेल्या कामांची दावे एसबीआयला सादर करावयाचे असून त्यानुसार तेवढी रक्कम एसबीआय केंद्र सरकारला कर्ज स्वरुपात देत आहे. हे कर्ज फेडीसाठी तिकिटावर अधिभार आकारून फेडण्याचेही निश्चित झाले आहे

एमयुटीपी ३ मधील कामेविरार-वसई-पनवेल ७०.१४ किमीच्या दुपदरीकरणामुळे विरार आणि पनवेल ही दोन शहरे लोकलने जोडली जाणार आहेत. तर कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकमुळे कल्याणमधील प्रवाशांना ठाण्याला न उतरता वाशी गाठणे सोपे होणार आहे. कल्याण ते नवी मुंबईदरम्यान ४० फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. यामार्गावर दिघा रेल्वे रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.तसेच ‘परे’च्या विरार-डहाणू चौपदरीकरणामुळे मेल/एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका करून लोकल, मेल/एक्स्प्रेस सेवा स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहेत.