शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी आदिवासी वाडीतील मुले शिक्षणापासून वंचित

By admin | Updated: October 31, 2015 00:16 IST

नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील कोरळवाडी येथील आदिवासी बांधव अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

वैभव गायकर, पनवेलनवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील कोरळवाडी येथील आदिवासी बांधव अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रोजगारासाठी दररोज ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करून उदरनिर्वाहाचे साधन शोधणाऱ्या या आदिवासींची नेतेमंडळींकडून केवळ आश्वासनांवर बोळवण करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक देतात. वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ५ वीनंतर शिक्षणासाठी मुलांना दररोज जंगलातून ६ किमीची पायपीट करावी लागते. त्यामुळे वाडीतील अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित आहेत. सरकारने याबाबत लक्ष घालून वाडीसाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी येथील राम वाघे यांनी केली आहे.आदिवासी पाड्यासाठी वारंवार रस्त्याची मागणी करूनही अद्याप हक्काचा मार्ग मिळालेला नाही. कधी पनवेल वनविभागाची तर कधी पेण वनविभागाची मंजुरी नसल्याचे सांगून प्रशासनाकडून टोलवाटोलवी होत असल्याची प्रतिक्र या वाडीतील माजी ग्रामपंचायत सदस्य बापू पवार यांनी दिली. वाडीला पाणीपुरवठा करतो, असे दर्शवून एका कंपनीने सिडकोकडून पाणीपुरवठ्यात वाढ करून घेतली. मात्र प्रत्यक्षात वाडीपर्यंत पाणीच पोहोचले नाही. इतकेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस येणारे पाणीही बंद झाले आहे. त्यामुळे बोअरवेलवर अथवा तिथे पाणी न आल्यास ३ किमीची पायपीट करावी लागत असल्याचे येथील तुळसाबाई राम वाघे यांनी सांगितले.