शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा

By नारायण जाधव | Updated: November 13, 2023 15:03 IST

आठ विभाग कार्यालयांच्या अखात्यारीत स्वच्छता मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सारा देश दिवाळी आपल्या घरादारांच्या स्वच्छतेस प्राधान्य देत असताना स्वच्छ शहरांच्या यादीत प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईकरांनी लक्ष्मी पूजनाच्या रात्री खाद्यपदार्थांसह फटाके आणि फुलांचा तब्बल २७ टन ७०० किलो कचरा करून आपल्या असंवेदनशिलतेचे दर्शन घडविले. तर शहरवासीयांनी केलेला हा कचरा नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आठ विभागीय कार्यालयांच्या अखात्यारीत विशेष पथकांद्वारे साफ करून आपल्या कार्यतत्परेतेच दर्शन घडविले.

दिवाळी म्हटले की, सर्व जण आपली घरे, दारे, कार्यालये, दुकाने स्वच्छ करतात. दिवाळीच्या आधीच ही स्वच्छतो माेहीम सुरू असते. परंतु, वसुबारसपासून सुरू असलेला दिवाळसण खऱ्या अर्थाने साजरा होतो लक्ष्मीपूजनानंतर. यादिवशी प्रत्येक घरात, कार्यालयात, दुकानदारांकडून विधीवत पुजाअर्चा केली जाते. फुलांची आरास केली जाते. तोरणे बांधली जातात. नंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, हे करताना अनेक जण उरलेली फुले, तोरणांचा कचरा आणि अंगणात, परिसरात फोडलेल्या फटाक्यांचा कचरा तसाच ठेवतात.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ३७५ सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक केली होती. १० रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने आणि १३ मिनी टिपर वाहने यांच्या माध्यमातून या स्वच्छता मोहीमेत गोळा केलेला प्रामुख्याने फटाक्यांच्या कच-यासह इतर कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहून नेला. स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या कार्यवाहीवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व ठिकाणी भेटी देत बारकाईने लक्ष ठेवून होते.

शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर पहाटे १ ते ५ या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खाद्यपदार्थ यांचा ९ टन ६०० किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके, कागद, पुठ्ठे, कापड यांचा १८ टन १०० किलो सुका कचरा गोळा करून एकूण २७ टन ७०० किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला. यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईतील रस्ते सकाळी स्वच्छ दिसत होते, अशी माहिती राजळे यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका