शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

५० पैसेखालील आणेवारीत एकाही गावाचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:47 IST

पालघर जिल्ह्यामध्ये पैसेवारी जाहीर : ३२ गावे पीक पैसेवारीविना

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर हा आदिवासीबहुल कृषिप्रधान जिल्हा असून जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावांत ५० पैसेखालील आणेवारी नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली  आहे.     पालघर तालुक्यात एकूण गावांची संख्या २२४ असून खरीप गावांची संख्या २१४ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या २१४ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या १०  आहे.  डहाणू तालुक्यात एकूण गावांची संख्या १८३ असून खरीप गावांची संख्या १८१ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १८१ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे. वाडा तालुक्यात एकूण गावांची संख्या १७२ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १७० आहे. अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे.     विक्रमगड तालुक्यात गावांची संख्या ९४ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या ९४ आहे. जव्हार तालुक्यात गावांची संख्या १०९ असून या सर्वच गावांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे. मोखाडा तालुक्यातील सर्वच ५९ गावांची पैसेवारी जाहीर झालेली आहे. तलासरी तालुक्यातही सर्वच ४२ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

पालघर जिल्ह्यातील एकूण ३२ गावांमध्ये भातपीक नसल्यामुळे पीक पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात देलवाडी, अकरपट्टी, दांडी, नवापूर, आशेरी, नवी दापचारी, खारमेद्री, खारवडश्री, नवी अकरपट्टी, नवी पोफरण, डहाणू, मल्याण, वर्धा, शिळ, समेळ, सोपारा, निळेमोरे, तुळींज, नवघर, कराडी, तरखड, आक्तन, नायगाव, चोबारे, किरवली, पाली, निर्मळ, विरार, मनवेलपाडा, आचोळे, वालीव, सातिवली, आगाशी, धोवली या गावांचा यामध्ये समावेश आहे. 

वसईतील पैसेवारी वसई तालुक्यात गावांची संख्या १२५ इतकी असून खरीप गावांची संख्या १०५ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १०५ इतकी असून अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या २० आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई