शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चोरलेली सुपारी पचवण्यासाठी पेटवले वेअरहाऊस; पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 3, 2024 19:57 IST

उरण येथील वेअरहाऊसला लागलेल्या आगीचा उलगडा करून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

नवी मुंबई: उरण येथील वेअरहाऊसला लागलेल्या आगीचा उलगडा करून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांनी दोन कोटींच्या सुपारीची केलेली चोरी उघड होऊ नये यासाठी संपूर्ण वेअरहाऊसच पेटवून दिले होते. त्यामद्ये तब्बल १८ कोटीच्या मालाचे नुकसान झाले होते. मात्र या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता काही कामगारांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी हि आग लागली नसून लावली असल्याचा प्रकार उघडकीस आणला. 

उरणच्या कंठवली येथील सामवेदा लॉजिस्टिक या वेअरहाऊस मध्ये आग लागल्याची घटना ९ जानेवारीला घडली होती. यामध्ये त्याठिकाणी साठा असलेली १८ कोटींची सुपारी जळून खाक झाली होती. शिवाय आगीच्या या घटनेमुळे परिसरातील इतरही गोडावून धोक्यात आले होते. या घटनेनंतर उरण पोलिसांनी अधिक तपासाला सुरवात केली होती. आग लावली कि लागली याचा उलगडा करण्यासाठी वेअरहाऊस मधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पोलिसांनी मिळवले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवाजी हुलगे अधिक तपास करत होते.

त्यांना आगीच्या काही वेळ अगोदर सुपारीचा साठा असलेल्या ठिकाणी काही कामगार संशयितरित्या ये जा करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. यामुळे त्यांची वेगवेगळी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये त्यांनी सुपारीची चोरी लपवण्यासाठी आग लावल्याचे उघड झाले. त्यानुसार रोमेश भुवड, सिद्धेश रहाटे, किरण पंडित, दिगंबर वानखेडे, संजय घाग, सचिन कदम व पांडुरंग उर्फ पांड्या शेरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यातले पाच जण कंपनीचे कामगार असून दोघे बाहेरचे सहकारी आहेत.

त्यांनी मिळून मागील काही दिवसात वेअरहाऊस मधून सुमारे २ कोटींच्या सुपारीची चोरी केली होती. मात्र मालाची तपासणी झाल्यास आपली चोरी उघड होईल याची त्यांना भीती होती. त्यामुळे आगीची दुर्घटना घडवून आणण्याचा कट रचून त्यांनी आग लावली होती. त्यामध्ये वेअरहाऊसमध्ये असलेली १६ कोटींची सुपारी, इतर साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. अटकेनंतर त्यांच्याकडून चोरीच्या सुपारीच्या ३०० गोण्या हस्तगत केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले. तर उर्वरित २०० गोण्यांबद्दल अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये त्यांचे इतर साथीदार आहेत का ? याचाही अधिक तपास उरण पोलिस करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग