शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बँक ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीचा भांडाफोड; दौंडमध्ये घेतले होते भाड्याने घर

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 22, 2024 18:41 IST

मोटारसायकलवरून कल्याण मार्गे नवी मुंबई व ठाणेत येऊन बँकांमधून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून संधी मिळताच त्यांची रोकड पळवायचे.

नवी मुंबई : नवी मुंबईसह ठाणे परिसरात बँकेत पाळत ठेवून रोकड घेऊन जाणाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीच्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी केलेले आठ गुन्हे उघड झाले असून टोळीवर यापूर्वीही १७ गुन्हे दाखल आहेत. दौंड येथे भाड्याने घर घेऊन ते सहा वर्षांपासून राहत होते.

बँकेतून रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांची रोकड लुटण्याच्या घटना शहरात घडत होत्या. रस्त्यालगत गाडी लावताच काचा फोडून किंवा झटका देऊन पैशाच्या बॅग पळवल्या जात होत्या. मात्र यामागे नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यामुळे या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी यांनी पथक केले होते.

त्यामध्ये सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, अनिल देवळे, आकाश पाटील, सुशील मोरे, प्रकाश मोरे, वैभव पाटील, सुधीर पाटील, सचिन घनवटे आदींचा समावेश होता. त्यांनी घडलेल्या अनेक गुन्ह्यांच्या विश्लेषणातून संशयित दुचाकीची माहिती मिळवली होती. मात्र कल्याण नंतर पुढे ती कुठे जाते याचा उलगडा होत नव्हता. त्यानंतरही कौशल्याचा वापर करून पोलिसांनी संशयितांच्या दौंड येथील राहण्याच्या ठिकाणाची माहिती मिळवून त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व एकजण पोलिसांना मिळून आला. तर त्याचे सहकारी अगोदरच तिथून निघून गेल्याने ते मिळून आले नाहीत. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताच अटक करण्यात आली आहे. 

प्रवीण राजू गोगुला (२३) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा आंध्रप्रदेश मधील करालातीप्पा गावचा असून त्याचे इतर सहकारीही त्याच परिसरातले आहेत. त्यांनी दौंड येथे सहा महिन्यांपूर्वी घर भाड्याने घेतले होते. मोटारसायकलवरून कल्याण मार्गे नवी मुंबई व ठाणेत येऊन बँकांमधून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून संधी मिळताच त्यांची रोकड पळवायचे. यासाठी त्यांचा एक सहकारी बँकेत थांबून कोणत्या व्यक्तीने अधिक रोकड काढली आहे यावर नजर ठेवून बाहेर थांबलेल्या सहकाऱ्यांना त्याची माहिती द्यायचा. त्यांनी नवी मुंबई, ठाणे, शिर्डी, फलटण येथेही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे, वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी व तपास पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

"चलन" ठरले महत्वाचा "धागा"

पोलिस संशयित दुचाकीचा शोध घेत असताना, त्या दुचाकीवर दौंडमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई झाल्याचे चलन समोर आले. त्यावेळी दंड भरताना त्यांनी वापरलेल्या मोबाईल नंबरमुळे गुन्हे शाखा पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचू शकले.    

कल्याणमध्ये तुटायची साखळी 

संशयित दुचाकीच्या मागावर पोलिस असताना कल्याण पासून पुढे कुठे जातेय याचा शोध लागत नव्हता. पकडले जाऊ नये यासाठी आरोपींची दौंडमध्ये घर भाड्याने घेतल्यानंतर कल्याण मागे नवी मुंबई व ठाणेत येऊन गुन्हा करून त्याच मार्गे परत दौंडला जात होते. शिवाय ते मोबाईल वापरत नसल्याने तांत्रिक तपासातही त्यांची माहिती समोर येत नव्हती.