शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

नवी मुंबई: 'व्हर्टिकल स्लम'कडे नेणारा विकास आराखडा

By नारायण जाधव | Updated: April 3, 2023 08:12 IST

नवी मुंबई महापालिकेला स्थापनेनंतर ३१ वर्षांनंतर प्रारूप विकास आराखडा तयार करण्याची जाग आली. तोपर्यंत शहरात वाट्टेल तशी अतिक्रमणे झाली.

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक​​​​​​​

नवी मुंबई महापालिकेला स्थापनेनंतर ३१ वर्षांनंतर प्रारूप विकास आराखडा तयार करण्याची जाग आली. तोपर्यंत शहरात वाट्टेल तशी अतिक्रमणे झाली. या काळात 'सिडको ने सार्वजनिक सुविधांचे अनेक भूखंड विकून बिल्डरांच्या घशात घातले. विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वेस्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा; परंतु नवी मुंबईच्या नव्या विकास आराखड्याची एकंदरीत रचना पाहता तो नवी मुंबईला नजीकच्या भविष्यात 'व्हर्टिकल स्लम कडे नेणारा दिसत आहे. वास्तविक, नगररचना कायदा १९६६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाल्यानंतर शासनाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी चार वर्षांतच शहराचा विकास आराखडा तयार करून शासनाची मंजुरी घेऊन त्यानुसार काम करणे अभिप्रेत असते; परंतु येथील नगररचना अधिकाऱ्यांनी या ३१ वर्षांत सीसी / ओसी देऊन बिल्डरांची सेवा करण्यातच धन्यता मानली.

आता उशिरा का होईना तो तयार करताना वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठ्याचे स्रोत, झोपडपट्टा, एमआयडीसी आणि गावठाणे यांचा विचार केलेला नाही. त्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने काही अभ्यासपूर्ण सूचना केल्या. त्यानुसार अंमलबजावणी सुरू असतानाच 'सिडको'ने आक्षेप घेतल्याने काही लोकप्रतिनिधी भूखंडाच्या मुद्यावर न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने 'सिडको'स भूखंड विकण्यास मुभा दिली. त्यामुळे तेलही गेले अन् तूपही गेले, हाती धुपाटणे आले', अशी महापालिकेची अवस्था झाली. अशातच कोरोनाची लाट आली. ती बिल्डरधार्जिण्या नगररचना अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडली. त्यांनी लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत केलेल्या सूचना विचारात न घेताच, आहे त्याच विकास आराखड्यावर सामान्य जनतेकडून हरकती मागविल्या. त्या १५ हजारांवर आल्या असून, सध्या सुनावणी सुरू आहे.

त्यात शहरातील आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा विकास आराखडा नसून तो भकास आराखडा आहे, असा त्यांचा आरोप आहे. तो शंभर टक्के खरा दिसत आहे. कारण या विकास आराखड्यात नव्या 'यूडीसीपीआर' अर्थात एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकासात बिल्डरांना पाच ते साडेसातपर्यंत चटई क्षेत्र मिळणार आहे. मग वाढत्या लोकसंख्येला पाणी कोठून आणणार? आताच मोरबेची पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्र एक दिवस बंद ठेवले तरी शहरात पाणीबाणी होते. सध्या शहराची लोकसंख्या १८ लाख आहे. नव्या 'यूडीसीपीआर नुसार ती तीन ते चारपट होईल. मग घनकचरा विल्हेवाटीसाठी डम्पिंग ग्राउंडचे नियोजन कुठेच दिसत नाही?

१४ गावांचा फुटबॉल

शीळफाटा परिसरातील ठाणे तालुक्यातील १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. खरे तर या गावांचा फुटबॉल झालेला आहे. कधी नवी मुंबई महापालिका. कधी एमएमआरडीए, कधी जिल्हा परिषद, तर कधी नैना व परत नवी मुंबई महापालिका. मग येथील नियोजन अन् विकास आराखड्याचे काय? याचाही विचार करायला हवा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका